औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापल्यानंतर उपराजधानी नागपुरात उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी ५१ जणांना अटक केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास नागपुरात दोन गट भिडले. त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापल्यानंतर उपराजधानी नागपुरात उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी ५१ जणांना अटक केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास नागपुरात दोन गट भिडले. त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यावेळी अनेक घरं, दुकानं, वाहनं लक्ष्य करण्यात आली. सोमवारी झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या संशयाला बळ देणारी माहिती पोलीस तपासातून पुढ आली आहे.
हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या एफआयआरमध्ये ५१ जणांची नावं आहेत. त्यांचे पत्तेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे यातील जवळपास निम्मे आरोपी मध्य नागपूरचे रहिवासीच नाहीत. सोमवारी रात्रीच्या सुमारास मध्य नागपुरात हिंसाचार उफाळला. या प्रकरणात पोलिसांच्या एफआयआरमध्ये ५१ जणांची नावं आहेत.










