नागपुरच्या भालदारपुरा परिसरात झालेल्या हिंसाचारात अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले असून जमावाने महिला पोलिस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. आता याबद्दल बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम हे दिसले आहेत. या प्रकरणात त्यांनी मोठी माहिती सांगितली आहे.नागपुरच्या भालदारपुरा परिसरात हिंसाचार झाला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण बघायला मिळाले. या हिंसाचारात अनेक पोलिस अधिकारीही जखमी झाले. जमावाकडून पोलिसांना टार्गेट करण्यात आले. हेच नाही तर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्नही जमावाकडून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. महिला कर्मचाऱ्यांसोबत जमावाकडून चुकीचे वर्तन करण्यात आले. गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत अनेक जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कडक पाऊले उचलण्याचे आदेश दिले.
नागपुरच्या हिंसाचाराबद्दल बोलताना नुकताच गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, तपासामध्ये आणि व्हिडीओ रेकार्डिंगमध्ये ज्या गोष्टी पुढे येत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत. त्याचे गांर्भिय लक्षात घेता जे कोण दोषी आहेत. त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल. दोषींना अजिबात सोडले जाणार नाही. पोलिसांवरती हात उचलण्याची हिंमत होत असेल पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल. योग्य कायद्याने कारवाई केली जाईल.घरावरून आणि छतावरून दगडांचा वर्षाव होत असेल तर ही फार जास्त गंभीर बाब आहे. काही गोष्टी अशा आहेत, ज्या पुढे येत आहेत त्याच दिवशी काही ठरावीत लोकांच्या गाड्या तिथे पार्क नसणे, काही ठराविक दुकाने बंद असणे, काही ठराविक घरांमध्ये लोक नसणे. यामुळे हा एक पुर्वनियोजित कट दिसतोय. यामुळेच या विषयाचे गांर्भिय लक्षात घेता तपासामध्ये अनेक गोष्टी पुढे येतील.










