शेतकरी कवटाळतोय मृत्यूला; यवतमाळमध्ये १०० दिवसांत ८८, तर २५ वर्षांत ‘इतक्या’ जणांनी संपवलं जीवन.

आर्थिक अडचणीत आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अवघ्या शंभर दिवसांतील या घटनांनी शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.सततची नापिकी, वाढता लागवड खर्च आणि शेतमालाच्या कोसळलेल्या दरांमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अवघ्या शंभर दिवसांतील या घटनांनी शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात २००१पासून ६ हजार २४४ शेतकरी आत्महत्या झाल्या. यातील २ हजार ५५८ पात्र तर ३ हजार ५९० अपात्र ठरल्या. ९६ प्रकरणांची अजूनही चौकशी सुरू असल्याची सरकारी आकडेवारी सांगते.महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे यांनी आपल्या पत्नी व तीन मुलींसह वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे १९ मार्च १९८६ रोजी सामूहिक आत्महत्या केली होती. आज, बुधवारी या घटनेला ३८ वर्षे पूर्ण होत आहेत.या घटनेनंतर शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत असला तरी नैसर्गिक आपत्ती, घटते उत्पादन, बाजारात शेतमालाचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत.यंदाच्या हंगामात हमीभाव केंद्र उशिरा सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पडक्या दरात सोयाबीन आणि कपाशीची विक्री केली. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना १ लाख ९१ हजार ३२३ शेतकऱ्यांचे २४१ कोटी १९ लाख मंजूर होऊनही मिळाले नाही. कापूस व सोयाबीन हमीभावापेक्षा कमी किमतीत विकल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने भावांतर योजना आणली.

तांत्रिक अडचणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील लाखो शेतकरी लाभापासून वंचित आहेत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील जिल्हा बँकेच्या ५५ हजार खातेदार शेतकऱ्यांना ४०० कोटींची मदत सात वर्षे उलटूनही मिळाली नाही. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान होऊनही पीकविम्याची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण, कर्जमाफी झालीच नाही. दुसरीकडे खरीप पिकांची पैसेवारी ४८ टक्के असल्याने कर्जाचे नूतनीकरण करून कर्जाचे हप्ते पाडले जातील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. अजूनही ती शक्यता धूसर असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा आरोप होत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी कुटुंबासह पवनार आश्रमात १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. ही पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद आहे. या घटनेला ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबविता आलेल्या नाहीत.शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज, बुधवारी किसानपुत्र अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. ‘लोकसभा-विधानसभा दखल घेईल की नाही हे आज सांगता येत नाही.

तरी आज गावोगावच्या ग्रामपंचायती, ग्रामसभांनी आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धाजली अर्पण करणारा ठराव करून विधानसभेच्या अध्यक्षांना पाठवावा’, अशी सूचना किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी कुटुंबासह पवनार आश्रमात १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. ही पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद आहे. या घटनेला ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबविता आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज, बुधवारी किसानपुत्र अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. ‘लोकसभा-विधानसभा दखल घेईल की नाही हे आज सांगता येत नाही. तरी आज गावोगावच्या ग्रामपंचायती, ग्रामसभांनी आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धाजली अर्पण करणारा ठराव करून विधानसभेच्या अध्यक्षांना पाठवावा’, अशी सूचना किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केली आहे.गेल्या हंगामात जिल्हा बँकेकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजासह ३१ मार्चपर्यंत कर्जफेड करण्यासाठी बैंकने मिशन वसुली मोहीम कडक केली आहे. यापूर्वी त्यांच्या व्याजाचा परतावा केंद्र व राज्य सरकारकडून बँकेला मिळत होता. सरकारने व्याज परताव्याची ही रक्कम जिल्हा बँकेला न दिल्याने अडचण वाढून ही वसुली सुरू करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.