फडणवीसांच्या पीएविरुद्ध बंडखोरी, बावनकुळेंसोबत चार्टर्ड प्लेनने दिल्लीवारी, अमित शाहांचा शब्द, अखेर फळ मिळालं.

भाजपने विधानपरिषदेसाठी संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांना उमेदवारी जाहीर केली. या यादीतील केचे यांच्या नावाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले.विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्याने आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांनी अपक्ष दंड थोपटले होते. प्रदेशाध्यक्षांनी चार्टर्ड विमानाने थेट दिल्लीला घेऊन जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घालून दिली. या भेटीत केचे यांना विधान परिषदेत उमेदवारीचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली. भाजपचे उमेदवार सुमित वानखडे यांना बळ देऊन त्यांचा विजय निश्चित केला. शहा यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती रविवारी भाजपने विधान परिषदेच्या उमेदवारीतून केल्याची चर्चा आहे.भाजपने विधानपरिषदेसाठी संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांना उमेदवारी जाहीर केली. या यादीतील केचे यांच्या नावाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. आष्टी तालुक्यातील अंबिकापूरमध्ये ५ एप्रिल १९५४ रोजी त्यांचा जन्म झाला. गावाजवळील बेलवाडीत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी केचे यांनी आष्टी गाठले. आष्टी शहीद येथील हुतात्मा विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर आर्वी येथील कला व वाणिज्य विद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षणप्रवास केला.

सोबतच टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण करून इन्स्टिट्यूट सुरू केली. हे करीत असताना केचे आणि त्यांच्या पत्नीला आर्वी नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा सहकाऱ्यांनी आग्रह धरला. १९९०मध्ये दोघांनीही निवडणूक लढवून विजय मिळविला. १९९५मध्येदेखील नगरसेवक झाले. पुढे भाजपचे आर्वी तालुकाध्यक्ष, वर्धा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. पक्षबांधणी करताना कार्यकर्तेही जोडले.केचे यांनी २००४मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली. यात त्यांचा पराभव झाला. २००९मध्ये परत त्यांनी निवडणूक लढवित काँग्रेसच्या अमर काळे यांचा पराभव केला. २०१४च्या निवडणुकीत केचे यांचा पराभव झाला. २०१९मध्ये भाजपने परत केचे यांच्यावर विश्वास दाखविला. हा विश्वास सार्थ करीत त्यांनी विजय मिळविला.

विद्यमान आमदार असल्याने आपल्याला उमेदवारी मिळणार या आशेने त्यांनी मोर्चेबांधणी केली. पण, पक्षाने देवेंद्र फडणवीस यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली. यावरून नाराज झालेल्या केचे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.भाजपने सावध पवित्रा घेत त्यांची मनधरणी केली. तरीही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चेसाठी नेण्यात आले. त्यांना विधान परिषदेत संधी दिली जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिले. यानंतर केचे यांनी पत्रपरिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. शहा यांनी केचे यांना दिलेला शब्द पाळल्याची चर्चा यानिमित्ताने आहे. विशेष म्हणजे, केचे यांनी राजकीय संन्यास जाहीर करून नंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मागेही घेतला होता.विदर्भातील शिवसेनेने रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने, यवतमाळ-वाशीमच्या माजी खासदार भावना गवळी आणि भाजपचे माजी आमदार दादाराव केचे अशा तीन नेत्यांचे विधानपरिषदेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. तुमाने यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य पुनर्वसनाचा शब्द दिला होता. लोकसभेत उमेदवारी नाकारल्यानंतर विधानपरिषदेचे सदस्यत्व देऊन गवळी यांची राजकीय प्रवास कायम राखला गेला. नंतर वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. पण, त्यांचा पराभव झाला. तरीही विधानपरिषदेतील त्यांचे सदस्यत्व कायम आहे. यानंतर आता भाजपनेही आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देत निष्ठेचे फळ दिले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.