शरद पवार यांनी राज्यातील वातावरणाबाबत मत व्यक्त केले. त्यांनी काही लोका सत्तेच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली आणि राज्य सरकारने कठोर धोरणे आखण्याची गरज आहे. जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बारामती येथे चर्चा झाली.शरद पवार हे नुकताच राहुल सोलापूरकर यांच्याबद्दल बोलताना दिसले आहेत. ते म्हणाले की, सरसकट राज्यातील वातावरण असे आहे असे मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अशांना सामोरे जाण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. सक्त भूमिका घ्यावी. सत्तेचा गैरवापर आणि लोकांमध्ये जात आणि धर्म याच्यातील अंतर वाढवण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारने बघ्याची भूमिका घ्यायला नाही पाहिजे.शरद पवार हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येंबद्दल बोलताना म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांची माहिती मिळते ती चिंताजनक आहे. यासंदर्भात ठीक ठिकाणची माहिती एकत्रित करणार आहोत. बाबत केंद्र सरकारने एखाद धोरण आखावं.










