शेतावर गेले, पोहण्याचा मोह आवरेना; मालकाच्या मुलासोबत मजुर पाण्यात उतरला, दोन्ही कुटुंब दु:खात बुडाले.

साताऱ्याच्या कराड तालुक्यातील करवडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीतील पाण्यात बुडून एकाच गावातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील करवडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीतील पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच गावातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे करवडी गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. राजवर्धन किशोर पाटील (२२ वर्षे) व राजेंद्र दादा कोळेकर-मोरे (५५ वर्षे) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.करवडी गावाच्या हद्दीत भटकी नावाच्या शिवारात सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक किशोर पाटील व त्यांच्या बंधूंची शेतजमीन आणि विहीर आहे. या विहिरीवर सुरू असलेली विद्युत मोटर बंद करण्यासाठी किशोर पाटील यांचा मुलगा राजवर्धन व त्यांच्या शेतात काम करणारे कर्मचारी राजेंद्र कोळेकर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते. विद्युत मोटर बंद केल्यानंतर राजेंद्र कोळेकर याला पोहण्याची इच्छा झाली. त्यावेळी परवानगी घेण्यासाठी राजवर्धन यांनी फोनवरून वडिलांना त्याबद्दल सांगितले. मात्र, दुपारची वेळ आहे, विहिरीत उतरू नका, असे वडिलांनी बजावले.असे असतानाही फोनवर बोलणे होताच राजवर्धन व राजेंद्र कोळेकर हे पोहण्यासाठी विहिरीतील पाण्यात उतरले. पंधरा-वीस मिनिट झाल्यानंतर किशोर पाटील यांनी मुलगा राजवर्धन व राजेंद्र यांना घरी येण्यासाठी फोन केला. मात्र, अनेकदा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्यामुळे शेवटी किशोर पाटील दुचाकीवरून शेतावर पोहोचले. विहिरीच्या बाहेर शेजारी दोघा जणांचे कपडे, चपला त्यांना आढळून आल्या. शंका आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना आणि घरातील लोकांना फोन करून शेतावर बोलावले. त्यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली.विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीतील सर्व सहा मोटर सुरू करून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला.

मात्र, लाईट गेल्यामुळे आणि विहीर खोल असल्यामुळे संपूर्ण पाणी उपसता आले नाही. शेवटी कराडमधील मासेमारी करणाऱ्या युवकांना बोलवण्यात आले. त्यांना पाण्यामध्ये राजवर्धन व राजेंद्र कोळेकर यांचे मृतदेह आढळून आले, त्यांनी ते बाहेर काढले.कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा करवडी गावात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.राजवर्धन हा करवडी गावातील होतकरु आणि हुशार युवक होता. किशोर पाटील यांनी अतिशय कष्टातून त्यांच्या मुलाला शिक्षण दिले होते. बारावीनंतर आळंदी येथील एमआयटीमध्ये तो कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. तिसऱ्या वर्षातील दुसरी सेमिस्टर परीक्षा संपल्यानंतर तो घरी आला होता. राजवर्धन गावाकडे आल्यानंतर वडिलांना शेतीमध्ये मदत करायचा. किशोर पाटील यांचा एकुलता एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने करवडी गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून दोघांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, या घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.