तळीरामांनी लावली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये आग, अर्धा हेक्टर जंगल जळून खाक, पोलिसांकडून तपास सुरू.

मुंबईतील बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींनी जंगलात आग लावली. आग जवळपास दीड तास प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. या आगीत राष्ट्रीय उद्यानातील अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले. पोलिस आता याप्रकरणात तपास करत आहेत.एक अतिशय धक्कादाक माहिती पुढे येताना दिसतंय. मुंबईच्या बोरिवली इथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला आग लागली. हैराण करणारे म्हणजे ही आग जंगलामध्ये तळीरामांनी लावली. दारूच्या नशेत त्यांनी चक्क जंगलात आग लावली. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. होळी म्हटले की, तळीरामांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातो. होळी असल्याने मोठ्या संख्येमध्ये तळीराम संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलाजवळा असलेला दहिसर परिसरात गेले होते. तिथे त्यांच्या पार्ट्या सुरू होत्या.

अचानक रात्री सहाच्या सुमारास दहिसर नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये मोठ्या आगीचे लोट दिसले. यानंतर अनेकांनी तिथून पळ देखील काढला. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग तळीरामांकडून लावण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठे प्रयत्न करून अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. जवळपास दीड तास या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला लागले.या आगीच्या घटनेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले असल्याचीही माहिती मिळतंय. अग्निशमन दल घटनास्थळी वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. आता ही आग नेमकी कोणी लावली याचा शोध हा घेतला जातोय. घटनेची माहिती मिळताच पोलिस देखील पोहोचले होते. ज्यावेळी ही आग लावण्यात आली, त्यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र, आगीचे लोट दिसल्यानंतर घटना उघडकीस आली.वनक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचारी देखील आग विझवण्यासाठी पोहोचले होते. या घटनेबद्दलचा अधिक तपास आता पोलिसांकडून केला जातोय. संबंधित लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. होळीनिमित्त शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळाला. जागोजागी पोलिसांकडून तपासणी केली जात होती. लोक होळी खेळण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.