राज्यातील प्रार्थनास्थळांवरील भोंगे लावण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्यांचा आवाज रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असावा. आवाजाची मर्यादा ५५ डेसिबलच्या आत राखणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांवर कारवाई होईल.राज्यातील प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासाठी परवानगी आवश्यक असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, हे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत. तसेच, ५५ डेसिबलची आवाजमर्यादा पाळावी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांवर सोपवण्यात आली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
आमदार देवयानी फरांदे यांनी राज्यातील प्राथर्नास्थळांवरील भोंग्यांबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.











