छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून रोज १.८० दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ होत आहे, ही मोठी समस्या बनली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत चालले आहे, ज्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणातून दररोज १.८० दशलक्ष घन मीटर पाण्याची वाफ होत आहे, अशी माहिती सूत्रांनी मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला पंधरा दिवस जेवढे पाणी लागते तेवढ्या पाण्याची एकाच दिवसात वाफ होत आहे. उन्हाचा चटका जसजसा वाढेल तसतसे बाष्पीभवनाचे प्रमाण देखील वाढेल असे सूत्रांनी सांगितले. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचे प्रमाण चांगलेच वाढू लागले आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या धरणात गतवर्षी याच वेळी २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठ्याचे प्रमाण ६६ टक्के आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे धरण भरून वाहू लागले. त्यामुळे धरणात पाण्याचा साठादेखील समाधानकारक आहे. धरणातील एकूण पाणी साठ्यापैकी १८४ दशलक्ष घनमीटर पाणी छत्रपती संभाजीनगर शहरासाठी राखून ठेवण्यात आले आहे.संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे दररोज १.८० दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. ज्यामुळे पाणीसाठ्यात मोठी घट होताना दिसत आहे.









