नागपूरात दहावीच्या परीक्षेत नापास होऊ शकतो या भीतीने एका विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची दुर्देवी घटना घडली आहे. गेले काही दिवस हा विद्यार्थी परीक्षेच्या तणावाखाली होता.दहावीच्या परीक्षेतील अपयशाच्या भीतीने एका विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील कुही बसस्थानकावर घडली. गेले अनेक दिवस हा विद्यार्थी परीक्षेच्या ताणाखाली होता.मिळालेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी कुही शहरातील एका नामांकित शाळेचा विद्यार्थी होता. मार्च २०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत तो नापास झाला होता. शासनाच्या ‘एटीकेटी’ नियमानुसार त्याने अकरावीत प्रवेश घेतला होता, मात्र त्यासाठी पूरक परीक्षेत अपयश आलेले विषय पास करणे आवश्यक होते. सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या पूरक परीक्षेसाठी त्याने तयारी केली होती, मात्र परीक्षेच्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील रस्ते बंद पडले. त्यामुळे तो परीक्षा केंद्रावर पोहोचू शकला नाही, आणि त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला.










