योगासनाला बसलेल्या निवृत्त शिक्षकावर मुख्याध्यापकाने घातला कुऱ्हाडीचा घाव.

शाळेचे मुख्याध्यापक राम खिलावन, ज्यांना शाळेतील अनियमिततेमुळे काढून टाकण्यात आले. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. याशिवाय व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीबाबतही त्यांचा अनेक लोकांशी वाद सुरू होता. कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की राम खिलावानने त्याच्या साथीदारांसह विद्या रामची हत्या केली.एका निवृत्त शिक्षकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील जालौनमध्ये घडली आहे. हादरवणारी गोष्ट म्हणजे ही हत्या शाळेच्याच माजी मुख्याध्यापकांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या मयताच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसही तिथे पोहोचले.

पोलिसांनी खून करणाऱ्या माजी मुख्याध्यापकाला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त केली आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.उत्तर प्रदेशातील जालौन येथे, रामपुरा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सिलुआ जागीर गावात ही घटना घडली. तीन खाजगी शाळांचे संचालक असलेले ७० वर्षीय विद्या राम आझाद हे निवृत्त शिक्षक होते. दररोजप्रमाणे, रविवारी सकाळी ते गावापासून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या भीमनगर उंचाकडे जाणाऱ्या छोट्या कल्व्हर्टवर बसून योग साधना करत होते. त्याच वेळी, त्याच्या शाळेच्या माजी मुख्याध्यापकाने विद्यारामच्या डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केली. या घटनेत, शिक्षकाचे डोके शरीरापासून वेगळे झाले. या भयानक हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला आणि आरोपीला अटक केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला.मृताच्या कुटुंबीयांना हे कळताच घरात गोंधळ उडाला. ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालत या घटनेचा निषेध केला. पोलिसांनी गुन्हा करणाऱ्या हल्लेखोराला अटक केली. आणि मग त्यांनी त्याची चौकशी सुरू केली.

घटनेनंतर पोलिस अधीक्षक डॉ. दुर्गेश कुमार हे देखील तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. असे म्हटले जाते की मृत विद्या राम यांच्या गावात तीन शाळा आहेत, ज्यांची देखभाल ते आणि त्यांची पत्नी प्रेमा देवी करत होते.त्यांच्या एका शाळेचे मुख्याध्यापक राम खिलावन होते. ज्यांना, शाळेतील अनियमिततेमुळे काढून टाकण्यात आले. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. याशिवाय व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीबाबतही त्यांचा अनेक लोकांशी वाद सुरू होता. कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की राम खिलावानने त्याच्या साथीदारांसह विद्या रामची हत्या केली.
या प्रकरणात, माधोगड सीओ राम सिंह म्हणाले की, विद्यारामच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. आणि त्याची चौकशी केली जात आहे. परिस्थिती लक्षात घेऊन, कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.