जुन्या भांडणाची कुरापत आणि भावकीच्या वादातून तालुक्यातील दातली येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.जुन्या भांडणाची कुरापत आणि भावकीच्या वादातून तालुक्यातील दातली येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सागर मारुती भाबड (वय ३५) या तरुणाचा मृत्यू झाला. मयत सागरच्या अंगावर कार घालून त्याला चिरडण्यात आल्याची चर्चा आहे.










