पुसद तालुक्यातील गावात गंभीर पाणीटंचाई आहे. निवडणुकीवेळी सरपंचाने पाण्याची समस्या सोडवण्याचं सांगितलं, मात्र कोणतेही प्रश्न पदावर विराजमान झाल्यावर सोडवले नाही. त्यामुळे महिलांनी सरपंचाचे हात दोरीने बांधले.यवतमाळ : गावातील पाणीटंचाई दूर करण्याचे दूर करण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या सरपंचाच्या शर्टवर ‘बेईमान सरपंच’ लिहून महिलांनी त्याचे हात दोरीने बांधले. नंतर सरपंचाला घेऊनच थेट उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. ही खळबळजनक घटना पुसद तालुक्यातील माळपठार भागातील सावरगाव गोरे येथे घडली.राज्याला आजवर दोन मुख्यमंत्री देणाऱ्या आणि मागील ७२ वर्षांपासून नाईक घराण्याची सत्ता असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठारावरील ४० गावांतील गावकरी भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. काही गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे हाती घेण्यात आली. पण, या कामांची गती संथ आहे. काही ठिकाणी निधी नसल्याने कंत्राटदाराने कामे बंद केली. अनेक ठिकाणी अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली. त्यामुळे कामे पूर्ण होऊनही गावातील पाणीटंचाई कायम आहे. सावरगाव गोरे येथे भीषण पाणीटंचाई असल्याने महिलांना दूर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे.










