निवडणुकीवेळी पाणीटंचाई दूर करण्याचं आश्वासन, मात्र परिस्थिती जैसे थे; महिलांना पाण्यासाठी सरपंचाला बांधलं.

पुसद तालुक्यातील गावात गंभीर पाणीटंचाई आहे. निवडणुकीवेळी सरपंचाने पाण्याची समस्या सोडवण्याचं सांगितलं, मात्र कोणतेही प्रश्न पदावर विराजमान झाल्यावर सोडवले नाही. त्यामुळे महिलांनी सरपंचाचे हात दोरीने बांधले.यवतमाळ : गावातील पाणीटंचाई दूर करण्याचे दूर करण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या सरपंचाच्या शर्टवर ‘बेईमान सरपंच’ लिहून महिलांनी त्याचे हात दोरीने बांधले. नंतर सरपंचाला घेऊनच थेट उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. ही खळबळजनक घटना पुसद तालुक्यातील माळपठार भागातील सावरगाव गोरे येथे घडली.राज्याला आजवर दोन मुख्यमंत्री देणाऱ्या आणि मागील ७२ वर्षांपासून नाईक घराण्याची सत्ता असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठारावरील ४० गावांतील गावकरी भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. काही गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे हाती घेण्यात आली. पण, या कामांची गती संथ आहे. काही ठिकाणी निधी नसल्याने कंत्राटदाराने कामे बंद केली. अनेक ठिकाणी अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली. त्यामुळे कामे पूर्ण होऊनही गावातील पाणीटंचाई कायम आहे. सावरगाव गोरे येथे भीषण पाणीटंचाई असल्याने महिलांना दूर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे.

पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावकऱ्यांनी सरपंचामार्फत अनेक निवेदने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. पण, त्यांच्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी प्रताप विठ्ठल बोडखे यांनी सरपंच झाल्यावर गावातील पाणीटंचाई सहा महिन्यांत दूर करू असे आश्वासन दिले होते. पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी काहीही केले नाही. यावरून संतप्त सावरगावमधील काही महिला आणि पुरुषांनी सरपंच बोडखे यांना दोरीने बांधून पुसदच्या उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चा काढला. नंतर तहसील कार्यालय आणि पंचायत समितीवरही घागर मोर्चा काढण्यात आला.उन्हाळ्याच्या दिवसांत विदर्भातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. दरवर्षीची ही समस्या असतानाही प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. यावरून अनेकदा आंदोलने केली जातात. वऱ्हाडातील खारपाणपट्ट्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर आहे. नागपुरात २७ बाय ७ पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. पण, ग्रामीण भागात अजूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची स्थिती आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माळपठारावरील या आंदोलनाने या प्रश्नाची चर्चा नव्याने होऊ लागली आहे.सावरगाव गोरे येथे २०२२ पासून या गावात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचा मुद्दा आंदोलकांनी मांडला. पुसद पंचायत समितीत गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन तास आंदोलकांशी चर्चा केली. जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून आंदोलकांच्या समस्या मांडल्या. अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने सायंकाळी ५ वाजतापर्यंत आंदोलन चालले. स्वच्छ पिण्याचे पाणी ही नागरिकांची मुलभूत गरज असताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मतदारसंघात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्यावरून संताप व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.