बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने होतील. मात्र, अजूनही आरोपींना काही शिक्षा होत नाहीये. तर एक आरोपी अजूनही फरार आहे. अशातच धनंजय देशमुख यांनी महत्त्वाच्या पुराव्याच्या शोधासाठी आरोपींची पुन्हा रिमांड घेण्याची मागणी आहे.सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता तपास कुठेतरी थांबल्यासारखा वाटत आहे. कारण आता जवळपा दोन महिने झाले तरीही फरार आरोप कृष्णा आंधळे याला पकडण्याच पोलीस यंत्रणांना यश आलेलं दिसत नाही. तर दुसरीकडे ज्या आरोपींना हत्या केली त्यांच्यावर मकोका लावण्यात आला. मात्र कोणतीही शिक्षा झालेली नाही. वाल्मिक कराडा आतमध्ये असून त्यालाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे विष्णु चाटे याचा मोबाईलही अजून मिळालेला नाही. सरपंचांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी हाच महत्त्वाचा पुरावा असलेल्या मोबाईलच्या शोधासाठी पुन्हा एकदा रिमांड घेण्यत यावी अशी मागणी केली आहे.










