तो एक पुरावा, ज्याने हत्येचं गूढ उकलणार?, धनंजय देशमुख यांची मोठी मागणी काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने होतील. मात्र, अजूनही आरोपींना काही शिक्षा होत नाहीये. तर एक आरोपी अजूनही फरार आहे. अशातच धनंजय देशमुख यांनी महत्त्वाच्या पुराव्याच्या शोधासाठी आरोपींची पुन्हा रिमांड घेण्याची मागणी आहे.सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता तपास कुठेतरी थांबल्यासारखा वाटत आहे. कारण आता जवळपा दोन महिने झाले तरीही फरार आरोप कृष्णा आंधळे याला पकडण्याच पोलीस यंत्रणांना यश आलेलं दिसत नाही. तर दुसरीकडे ज्या आरोपींना हत्या केली त्यांच्यावर मकोका लावण्यात आला. मात्र कोणतीही शिक्षा झालेली नाही. वाल्मिक कराडा आतमध्ये असून त्यालाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे विष्णु चाटे याचा मोबाईलही अजून मिळालेला नाही. सरपंचांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी हाच महत्त्वाचा पुरावा असलेल्या मोबाईलच्या शोधासाठी पुन्हा एकदा रिमांड घेण्यत यावी अशी मागणी केली आहे.

विष्णू चाटे याचा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही तर त्या मोबाईल मध्ये असलेले पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी या मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या आणि मोबाईल शोधून काढा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.विष्णू चाटेचा मोबाईल संतोष देशमुख यांची हत्या होऊन 58 दिवस झाले तरी अद्याप पोलीस यंत्रणेला सीआयडीला सापडलेला नाही. यामुळे या मोबाईल मध्ये नेमके काय होते असा प्रश्न कायम असून त्याचा शोध घेण्यासाठी आता पुन्हा एकदा या सर्व आरोपींची रिमांड घ्यावे अशीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातच असून ते या प्रकरणावर काही भाष्य करतात का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान, संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. बीडमधील आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण लावून धरत यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा आणि एकदम खास वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला. कराडला या अवादा कंपनी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करून अटक केली गेलीय. मात्र अद्यापही मयत सरपंच देशमुख यांचे कुटंबिया न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.