सावदा येथे आ . गं . विद्यालय उच्च माध्य. विभाग तर्फे कॉपीमुक्त अभियानाचे आयोजन.ज्ञान तपासून घेण्याचे साधन म्हणजे परीक्षा होय मुख्याध्यापक पी जी भालेराव यांचे मत .सावदा आं गं . हायस्कूल मध्ये कॉपीमुक्त अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सावदा नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आदरणीय भूषण वर्मा यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी भयमुक्त परीक्षा सामोरेजा शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानरूपी शिदोरीचा परीक्षा तथा जिवनात उपयोग करा असे विशेष मार्गदर्शन केले. तसेच, सन्माननीय मुख्याध्यापक पी जी भालेराव आणि इयत्ता बारावीचे वर्गशिक्षक यांनीही या अभियानाच्या उद्दिष्टांसाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन केले.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व सदस्य, तसेच पालक-विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले.
याशिवाय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या आदेशानुसार, इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त अभियानांतर्गत गैरमार्गाचा लळा सोडण्यासंबंधी उपक्रम राबविण्यात आला.सदर उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकता व शैक्षणिक नैतिकता वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. परीक्षा मंडळाचे आदेशानुसार २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना पर्यंत सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजनाचे विद्यार्थी पालकांनी याचे स्वागत केले आहे . सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी सहकार्य केले .









