तीन नवे फौजदारी कायदे आजपासून लागू; नव्या कायद्यांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय-काय परिणाम होणार?

New Criminal Laws: भारतीय न्यायिक संहिता (Indian Judicial Code), भारतीय नागरी संरक्षण संहिता (Indian Civil Defense Code) आणि भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act) हे तीन नवे फौजदारी कायदे, आज 1 जुलै 2024 (सोमवार) पासून लागू होणार आहेत.

भारतीय न्यायिक संहिता कायदा आता IPC (Indian Penal Code) ची जागा घेईल. ही दोन्ही विधेयकं संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली आहेत.

नव्या कायद्यात कलम 375 आणि 376 च्या जागी बलात्कारासाठी कलम 63 येणार आहे. सामूहिक बलात्कारासाठी कलम 70, हत्येसाठी कलम 302 ऐवजी 101 कलम असेल. भारतीय न्यायिक संहितेत 21 नवे गुन्हे जोडले गेले आहेत, ज्यामध्ये एक नवा गुन्हा म्हणजे, मॉब लिंचिंग. यामध्ये मॉब लिंचिंगवरही कायदा करण्यात आला आहे. 41 गुन्ह्यांमध्ये शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय 82 गुन्ह्यांमध्ये दंड म्हणून ठोठावण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

कोणत्या कायद्यांत काय-काय बदल, जाणून घेऊयात सविस्तर…

आजपासून म्हणजेच, 1 जुलैपासून बरेच काही बदलणार आहे. विशेषत: फौजदारी न्याय व्यवस्थेत. आजपासून, भारतीय न्यायिक संहिता 1860 मध्ये केलेल्या IPC ची जागा घेईल, भारतीय नागरी संरक्षण संहिता 1898 मध्ये बनवलेल्या CrPC ची जागा घेईल आणि 1872 चा इंडियन एविडंन्स अॅक्टची जागा भारतीय साक्ष्य अधिनियम घेईल.

हे तीन नवे कायदे लागू झाल्यानंतर अनेक नियम आणि कायदे बदलतील. यामध्ये अनेक नव्या विभागांचा समावेश करण्यात आला आहे. काही विभाग बदलण्यात आले आहेत, तर काही काढून टाकण्यात आले आहेत. नवे कायदे लागू झाल्यानंतर सामान्य माणूस, पोलीस, वकील आणि न्यायालय यांच्या कार्यपद्धतीत खूप बदल होणार आहेत.

भारतीय नागरी संरक्षण संहितेमध्ये समाविष्ट केलेले महत्त्वाचे बदल

CRPC मध्ये एकूण 484 कलमं असताना, भारतीय नागरी सुरक्षा संहितेत (BNSS) 531 कलमं होती. यामध्ये ऑडिओ-व्हिडीओ म्हणजेच, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गोळा केलेल्या पुराव्यांना महत्त्व देण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोणत्याही गुन्ह्यात कारागृहात जास्तीत जास्त शिक्षा भोगलेल्या कैद्यांना खासगी जातमुचलक्यावर सोडण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. कोणताही नागरिक गुन्ह्याच्या संदर्भात कुठेही शून्य एफआयआर दाखल करू शकेल. एफआयआर दाखल केल्यापासून 15 दिवसांच्या आत, तो मूळ अधिकारक्षेत्राकडे म्हणजेच, केस असलेल्या ठिकाणी पाठवावा लागेल. पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकाऱ्यावर खटला चालवण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून 120 दिवसांच्या आत परवानगी घेतली जाईल. जर ठरलेल्या अवधीत मंजुरी मिळाली नाहीतर, ते मंजूर असल्याचं मानलं जाईल.

एफआयआर झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं लागणार

एफआयआर झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं लागतं. कोर्टाला आरोपपत्र दाखल केल्यापासून 60 दिवसांच्या आत आरोप निश्चित करावे लागतील. यासोबतच खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निकाल द्यावा लागणार आहे. निकाल दिल्यानंतर त्याची प्रत 7 दिवसांत द्यावी लागेल. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना लेखी कळवावं लागेल. माहिती ऑफलाईन तसेच ऑनलाईन द्यावी लागेल. 7 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये, पीडितेला पोलीस ठाण्यात महिला हवालदार असल्यास, पीडितेचं म्हणणं नोंदवून कायदेशीर कारवाई करावी लागेल.

कोणत्या प्रकरणांमध्ये अपील करता येणार नाही?

भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम 417 मध्ये असं नमूद केलं आहे की, कोणत्या प्रकरणांमध्ये शिक्षेला उच्च न्यायालयात अपील करता येत नाही. जर एखाद्या दोषीला उच्च न्यायालयानं 3 महिने किंवा त्यापेक्षा कमी कारावास किंवा 3 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या असतील तर त्याला उच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही.

आयपीसीमध्ये कलम 376 होतं, ज्या अंतर्गत 6 महिन्यांपेक्षा कमी शिक्षेला आव्हान देता येत नव्हतं. म्हणजेच, नव्या कायद्यात काहीसा दिलासा देण्यात आला आहे. याशिवाय जर एखाद्या दोषीला सत्र न्यायालयानं तीन महिने किंवा त्यापेक्षा कमी कारावास किंवा 200 रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या असतील, तर त्यालाही आव्हान देता येणार नाही. त्याचबरोबर कोणत्याही गुन्ह्यासाठी दंडाधिकारी न्यायालयानं 100 रुपये दंड ठोठावला असेल, तर त्याविरुद्ध अपील करता येणार नाही. मात्र, तीच शिक्षा अन्य काही शिक्षेसोबत दिल्यास त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं.

काय-काय बदल होणार?

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.