जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना त्वरित मदत मिळावी आम्ही आपणास या निवेदनाव्दारे कळवू इच्छीतो की गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असून पंचनामे करून बरेच दिवस झाले परंतु अजून पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. आधीच खरीप हगामातील अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न आधीच कमी आले आणि त्याही मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.

रब्बी हंगामात चांगले उत्पादन घेता येईल या आशेवर असलेला शेतकरी मात्र परत अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडला आहे. आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या व काढणीला आलेला केळी व इतर पिकाला फटका बसला आहे. तरी आपनास आम्ही पुनश्च विनंती करतो की शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी. अविनाश भास्कर पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष ,प्रदीप पाटील जळगाव तालुका अध्यक्ष,विलास सोनार तालुका संघटक,संदीप मांडोळे,हर्षल वाणी शहर सचिव ,देवेंद्र माळी मनोज लोहार तालुका सचिव, आपला नम्र अविनाश भास्कर पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना.








