नालासोपारा येथून भाच्यासोबत मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या मावशी व बहिणीपैकी मावशीचा दुर्दैवी अंत मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या प्रवासी बोट दुर्घटनेत झाला आहे. रामलता देवी गुप्ता असे मृत महिलेचे नाव आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या प्रवासी बोट दुर्घटनेत आतापर्यंत १४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील गुप्ता कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नालासोपारा येथून भाच्यासोबत मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या मावशी व बहिणीपैकी मावशीचा दुर्दैवी अंत या दुर्घटनेत झाला आहे. रामलता देवी गुप्ता असे मृत महिलेचे नाव आहे. नालासोपारा येथे राहणारा गौतम गुप्ता (वय 25) याचे 12 डिसेंबर रोजी लग्न होते. गौतम याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशातील गाजीपुर जिल्ह्यातून त्याची मावशी रामलता देवी गुप्ता (वय 55) नालासोपारा येथे आल्या होत्या.लग्नकार्य उत्साहात पार पडले. त्यानंतर गौतम, त्याची मावशी रामलाता देवी व बहिण निमता देवी गुप्ता (वय 30) या दोघींना फिरण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया व एलिफंटा परिसरात गेला होता. गौतम, त्याची मावशी व बहिण असे हे तीघेजण दुपारी तीन वाजताच्या सुमारास बोटीत बसले. त्याचवेळी स्पीड बोट, हे तिघेही असलेल्या प्रवासी बोटीला धडकली व भीषण असा अपघात घडला.










