बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता धाराशिव येथेही पवनचक्कीवरुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. पवनचक्कीच्या वादातून ही हत्येची घटना घडली होती. त्यानंतर आता धाराशिवमध्येही धमकावल्याची घटना समोर आली आहे. धाराशिवमध्ये पवनचक्की ठेकेदारांकडून दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे. तुळजापुरातील मेसाई जवळगा या गावात रिन्यू कंपनीच्या पवनचक्की उभारणीच्या कामाला गावकऱ्यांनी नकार दिला होता. त्यानंतर काही लोकांनी येत गावकऱ्यांनी धमकावल्याचं समोर आलं आहे.










