गिरणा नदीला वाळु माफीयांचे ग्रहण ; अवैध वाळु वाहतुकी विरोधात एरंडोल महसूल ॲक्शन मोडमध्ये  मात्र कढोली हद्द समोरच धानोरा हद्दीत वाळु माफी यांचा हैदोस भर दिवसा व रात्री 70 ते 80 मशिनरीच्या साह्याने अवैध वाळु ऊपसा सूसाट..

एरंडोल : कांताई धरणातील पाण्यातअसलेल्या वाळूवर वाळू माफियांची वक्रदृष्टी पडल्यापासून कांताई धरणातील वाळूलाही ग्रहण लागले आहे कांताई धरणातील दोन्ही बाजूला वाळूमाफियांनी किनाऱ्यांचे संपूर्णतः सपाटीकरण करून भर दिवसा व रात्री बेधडकपणे मोठ्या प्रमाणात वाळु उपसा केला जात असल्याचे चित्र आहे पाण्यातून धानोरा हद्दीत 70 ते 80 मशनरी च्या साह्याने भर दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणात वाळु उपसा केला जात असल्याने भविष्यात गिरणापात्रात पाण्याचे परपुलेशन न होता शेतीसाठी व पिण्यासाठी मोठे जलसंकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे मात्र जळगाव तालुक्यातील महसूल विभागाचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे..

वाळू माफियांच्या ओव्हरलोड वाळूच्या वाहनांमुळे रस्त्यांची लागली वाट ; शाळकरी मुलांचा व प्रवाशांचा रोज सात ते आठ किलोमीटरचा पायी प्रवास, खेडी कढोली हद्दी समोरच गिरणा नदी पात्रात 70 ते 80 वाळू उपसा मशनरी च्या साह्याने दररोज शेकडो ब्रास वाढू काढली जात असल्याचे चित्र आहे तसेच वाळु काढल्यानंतर 50 ते साठ ट्रॅक्टर व 40 ते 50 पेक्षा जास्त हायवा व डंपर च्या साह्याने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वाळु तस्करी केली जाते आश्चर्याची बाब म्हणजे वाळू तस्करीसाठी राजकीय वरदहस्त असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे तसेच वाळूच्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांची पूर्णतः वाट लागल्याने एसटी बसेस गावात न येता जळगाव तालुक्यातील धानोरा गावापासून ते मोहाडी जवळ रेल्वेच्या चार पुलाव पर्यंत चार किलोमीटरच्या अंतरावर एसटी महामंडळाची बस थेट धानोरा पर्यंत न येता बस चार पुलापर्यंतच थांबत असल्याने पुलाव ते धानोरा हे अंतर तीन ते चार किलोमीटरचे अंतर असून ग्रामस्थ व शाळकरी तसेच जळगाव येथे कॉलेजला जाणाऱ्या मुला मुलींना रोजच सात ते आठ किलोमीटरचा पायी प्रवास करून जीव धोक्यात घालून त्रास सहन करावा लागत आहे मात्र याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.


एरंडोल महसूल विभाग ॲक्शन मोडमध्ये वैजनाथ टाकरखेडा गिरणा नदी पात्रात व कढोली हद्दीत धरणाच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळु उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल प्रशासनाला प्राप्त झाल्याने एरंडोल प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड व तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या आदेशान्वये महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावल्याने वाळूमाफीयांचे धाबे दणानाले आहे कांताई धरणाच्या पाण्यातून अवैध वाळु उपसा एरंडोल महसूल प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आला आहे कडोली येथे मंडळ अधिकारी संजय शिरसाठ तलाठी नितीन पाटील व कोतवाल जितेंद्र बडगुजर यांच्यासह एरंडोल येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्याही ड्युटी लावण्यात आली आह. मात्र कढोली हद्दीसमोरच जळगाव तालुक्यातील धानोरा हद्दीत भरदिवसा व रात्री 70 ते 80 मशिनरी यंत्रांच्या साह्याने भरमसाठ शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा केला जात असल्याने शासनाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसानीसह पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याने याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..