संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा; गुरुवर्य हैबतबाबा पायरी पूजनाने होणार प्रारंभ…

आळंदीत बुधवारपासून कार्तिकी वारी सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा; गुरुवर्य हैबतबाबा पायरी पूजनाने होणार प्रारंभ..

आळंदी : प्रतिनिधी योगेश व्हिरोळकर ; आळंदी कार्तिकी वारी, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास बुधवार (दि. १२) पासून भक्तिमय वातावरणात गुरुवर्य हैबतबाबा पायरी पूजनाने प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यातील कार्तिक एकादशीची मुख्य पहाट पूजा शनिवारी (दि. १५), तर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा सोमवारी (दि. १७) साजरा होणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदादेखील त्रयोदशीचा योग दोन दिवस आला असून, दि. १७व १८ रोजी त्रयोदशी आहे. कार्तिक एकादशी झाल्यानंतर द्वादशीच्या दिवशी खिरापत पूजा आणि तिसऱ्या दिवशी त्रयोदशी वारकरी परंपरेनुसार केली जाते. त्यामुळे परंपरेनुसार सोमवारी (दि. १७) त्रयोदशीच्या दिवशी माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. कार्तिकी वारीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोमवार (दि. १०) पासून सुरू होणार आहे.

कार्तिक एकादशीला शनिवारी (दि. १५) माउलींच्या संजीवन समाधीवरील पहाटपूजा १२ ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात प्रारंभ होईल. एकादशीला समाधी मंदिर दिवसभर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे. दुपारी १ वाजता माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडेल. यानंतर पालखी रात्री ९ वाजता मंदिरात परंपरेनुसार परतल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा आणि त्यानंतर धुपारती होईल. द्वादशीनिमित्त रविवारी (दि. १६) प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पहाटे साडेतीनच्या सुमारास पार पडेल. दुपारी ४ वाजता परंपरेप्रमाणे रथोत्सवासाठी माउलींची पालखी देऊळवाड्यातून बाहेर पडेल. समाधी सोहळादिनी सोमवारी (दि. १७) पहाटे ३ ते ४ वाजेदरम्यान प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती झाल्यावर मुख्य कार्यक्रमास सुरुवात होईल. सकाळी पाच ते साडेनऊ माउलींच्या चलपादुकांवर भाविकांच्या पूजा होतील. सकाळी ७ ते ९ महाद्वारात हैबतबाबांच्या पायरीपुढे कीर्तन, तर वीणामंडपातही कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वीणामंडपामध्ये संत नामदेव महाराजांच्या वंशजांच्या माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन होईल. दुपारी ठीक १२ वाजता संजीवन समाधी दिन साजरा होणार आहे. गुरुवारी (दि. २०) रात्री माउलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा आणि छबिना मिरवणुकीने कार्तिकी वारी सोहळ्याची सांगता होईल.

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..