भामलवाडी येथे शिवनेरी गणेश मंडळ तर्फे गणरायाची स्थापना.

रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी दर वर्षी प्रमाणे गेली 40वर्षाची परंपरा असलेल्या शिवनेरी गणेश मंडळ यांनी आला रे आला गणपती आला च्या गगन भेदी घोषणा देत लेझिम व ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत थेट महादेवाच्या मंदिरांपासून गावामध्ये बाप्पाचे आगमन झाले.आणि विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना करण्यात आली.महाराष्ट्र हा गणेश उत्सवाचा केंद्र बिंदू मानला जातो. श्रीगणेश हा विघ्नहर्ता मानला जातो, बुध्दी,विद्या, सुख समृद्धीसाठी त्याची पूजा केली जाते. लोकांना एकत्र आणून बंधुभाव निर्माण करणे. कला,नाटक, संगीत ,समाजसेवा,यांना चालना मिळवून देणे.हा या मागचा उद्देश असतो.ब्रिटिशांविरुद्ध जनतेला जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची सुरुवात केली. आणि म्हणून गणेश उत्सवा मध्ये 10 दिवस भजन, कीर्तन, प्रवचन , सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गणपती हा आद्यदेव मानला जातो.

कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्याची पूजा केली जाते. गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थी पर्यंत 10 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. पण या उत्सवाच्या पाठीमागील खरी प्रेरणा आणि उद्देश आजच्या पिढीला कितपत समजतो हा प्रश्र्न अधिक महत्त्वाचा आहे. परंतु भामलवाडी येथील शिवनेरी गणेश मंडळ व त्यातील सर्व तरुण मित्र या मागील खरे कारण समजून आपल्या मंडळातर्फे कोणालाही त्रास होईल, असे न वागता एकोप्याची भावना निर्माण करत हा उत्सव आनंदाने साजरा करून वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा जोपासत आहे.








