विधान परीषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणी इद्रीस नायकवडी यांनी गोरक्षकांबद्दल खालच्या पातळीवर टीका केली म्हणून याच्या निषेधार्थ शिवतीर्थ कोर्ट चौक जळगाव मधे श्री शिवप्रतीष्ठान युवा हिंदुस्थान च्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले,

महाराष्ट्रातील प्रामाणिक गोरक्षण करणाऱ्या गोरक्षकांना वारंवार बदनाम करणे जर थांबविले नाही तर सदाभाऊ खोत व इद्रीस नायकवडीला महाराष्ट्रात फिरू देनार नाही असा ईशारा देण्यात आला घरावर तुळशीपत्र ठेवुन आपला जीव धोक्यात घालुन गोरक्षक गोवंश वाचवत असतात त्यावेळी कसायांच्या हल्याला बळी पडतात आणि गोवंशाची अवैध वाहतुक करणारे ज्या वाहणाची क्षमता दोन गाइंची त्या वाहणात आठ दहा गाई गोवंश पाय बांधुन भुलीचे इंजेक्शन देऊन कोंबतात राष्ट्र गीताला विरोध करणाऱ्या, तसेच विनयभंगासारखे गुन्हे, असणाऱ्या , कडकनाथ कोबडी भ्रष्टाचार चे नायकवडी सदा खोत यांच्यावर मोक्का लावा ज्या भाकड गाई गोवंश असतील त्यांना शासनाकडुन अनुदान मिळवुन द्या जेनेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही,

आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आम्हाला गाइचे रक्षण केलीयाचे पुण्य बहुत हे शिकविले आहे म्हणून आम्ही इद्रीस व खोत सारख्यांना न जुमानता अखंड गोरक्षण देहात प्राण असे पर्यंत करीत राहु व वेळ पडली तर महाराष्ट्रातील सर्व गोरक्षकांना सोबत घेऊ तिव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा ईशारा श्री शिवप्रतीष्ठान युवा हिंदुस्थान चे जिल्हा प्रमुख गजानन माळी यांनी दिला यावेळी शहर प्रमुख अशोक शिंदे कृष्णा पानसंबळ, राहुल हटकर, सह इ.सहकारी गोरक्षक ऊपस्थीत होते








