भामलवाडी ते खिर्डी रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा..

रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी. रावेर तालुक्यातील खीर्डी ते भामलवाडी ह्या रस्त्याची फार दयनीय अवस्था झाली आहे.रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत,त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे,रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे केळीच्या ट्रक वारंवार रस्त्याच्या कडेला स्लीप होत आहे.आणि ह्या रस्त्याने चार गावांचा रात्रंदिवस वापर सुरू असतो.शाळेच्या मुलांसाठी बस सुरू झाली आहे परंतु रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना साईट देत असताना बस सुद्धा वारंवार स्लीप होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो.काही वेळेला विद्यार्थ्यांना तर पावसामध्ये पाइचं शाळेत जावे लागते.आणि आज तर भामलवाडी गावाजवळ ट्रॅक्टर पुढे जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली चे मागचे दोन्ही टायर ,आणि एक्सल,मागच्या मागे निघून पडले.आणि त्याचवेळी मागून शाळेची बस येत होती.आणि काही सेकंदा मुळे भला मोठा अनर्थ टळला.

तरी शासनाने या रस्त्याची पाहणी करून रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.अन्यथा शिंगाडी,भामलवाडी व पुरी गोलवाडे.या चारही गावातील ग्राम पंचायत सरपंच, व सदस्य, आणि विद्यार्थी उपोशनाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.








