बैलगाडीला वाचवताना स्कूल बस उलटली, आत 50 विद्यार्थी; योगायोग जुळून आला, थोडक्यात जीव वाचला.

उत्तर प्रदेशातील बिजनोरमध्ये एका शालेय बसला अपघात झाला, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नायगावजवळ बस विजेच्या खांबाला धडकली, ज्यात दहा विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने, वीजपुरवठा खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला.लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये एक मोठा अनर्थ टळला. सकाळच्या सुमारास शेरकोटला निघालेली शाळेची बस एका विजेच्या खांब्यावर आदळली. या अपघातात १० मुलं जखमी झाली. बसमध्ये एकूण ५० विद्यार्थी होते. नायगावच्या जवळ हा अपघात झाला. ११ हजार व्होल्ट हाय टेंशन विजेच्या खांबाला बसनं धडक दिली. पण वीज पुरवठा १५ मिनिटांसाठी खंडित झाल्यानं मोठा अनर्थ टळला.

शेरकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नायगावजवळ असलेल्या मंधौरा मार्गावर सकाळच्या सुमारास शाळेची बस उलटली. रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतात बस कोसळली. यामध्ये १० विद्यार्थी जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. समोरुन येत असलेल्या बैलगाडीला वाचवताना बसला अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच शेरकोट पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमी झालेल्या सहा विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.सकाळी पावणे आठच्या सुमारास बसला अपघात झाला. बस उलटताच विद्यार्थ्यांच्या किंकाळ्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. अनेक विद्यार्थी धाय मोकलून रडू लागले. त्यांचा आवाज ऐकून आसपासच्या शेतांमध्ये काम करणारे लोक त्यांच्या मदतीला धावले. मंधौरा गावचा रहिवासी असलेला अरविंद बस चालवत होता. आसपासच्या गावांमधील मुलं बसमध्ये होती. बाबू सिंह मेमोरियल शाळेत मुलांना सोडण्यासाठी अरविंद निघाला होता.

समोरुन येणाऱ्या बैलगाडीला वाचवण्यासाठी अरविंदनं बस थोडी बाजूला घेतली. तेव्हा बसचं चाक चिखलात अडकलं. रुतलेलं चाक काढण्याचा प्रयत्न करत असताना बस शेजारच्या शेतात कोसळली. त्याआधी बसनं विजेच्या खांब्याला धडक दिली. सुदैवानं त्यावेळी वीज प्रवाह सुरु नव्हता. बत्ती गुल झालेली असल्यानं विद्यार्थ्यांचा जीव बचावला.अफजलगढचे सीओ राजेश सिंह सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस अतिशय वेगात होती. त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती उलटली. चालक आणि वाहकावर कारवाई केली जाईल. या अपघाताचा तपास सुरु आहे. वीज पुरवठा खंडित झालेला असल्यानं मोठा अनर्थ टळला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.