शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास त्याच्या आडवं उभा राहणार : राजेश क्षीरसागर.

 शक्तिपीठ मोर्चाला समर्थन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी पाचपट मोबदला मिळणार असल्यास शेती देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे असं विरोधकांकडून सांगण्यात येतं आहे. दुसरीकडे, आज (19 जुलै) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या शेतकऱ्यांनी आपल्या हातामध्ये सातबारा उतारे घेतले होते. शेतीला पाचपट मोबदला पाहिजे, मोर्चातील शेतकऱ्यांची मागणी .

दरम्यान, शक्तिपीठ मोर्चाला समर्थन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी पाचपट मोबदला मिळणार असल्यास शेती देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. विरोधक शक्तीपीठ महामार्गाचे राजकारण करत असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास मी आडवा उभा राहणार असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना बेस्ट रेट देण्याचे आश्वासन दिले आहे. ज्या शिरोळ तालुक्यामधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे असं सांगण्यात येतं, त्याच शिरोळ तालुक्यातील 80 टक्के शेतकरी सातबारा उतारे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया असेही आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले. दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून आमदार राजेश क्षीरसागर गैरसमज पसरवत आहेत. राजेश क्षीरसागर यांना शक्तीपीठ महामार्गास जमीन पाहिजे असल्यास त्या बदल्यात त्यांच्या मालकीची जयप्रभा स्टुडीओमधील जागा शेतकऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी निमशिरगांव (ता. शिरोळ) येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी केली. शिरोळ तालुक्यातील ज्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जातो त्याठिकाणी 70 टक्के शेतकऱ्यांचे समर्थन असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुंबईत दिली.  निमशिरगांव गावातील सर्व बाधित शेतकरी एकत्रित येत शक्तीपीठ महामार्गास कडाडून विरोध केला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. अश्विनी गुरव यांना निवेदन देवून सदरचे निवेदन बाधित शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. राजेश क्षीरसागर यांच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जेवढी जमीन शक्तीपीठ महामार्गास जाणार आहे तेवढीच त्याबदलात जयप्रभा स्टुडीओची जागा जर राजेश क्षीरसागर शेतकऱ्यांच्या नावावर करत असतील तर खुशाल जमीनी घ्याव्यात अशा पध्दतीची मागणी करण्यात आली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.