अहिल्यानगर महापालिकेतील 776 रस्त्यांच्या कामात सुमारे 350 ते 400 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.अहिल्यानगर महापालिकेतील (Ahilyanagar Municipal Corporation) 776 रस्त्यांच्या कामात सुमारे 350 ते 400 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी खासदार राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. महापालिकेतील प्रशासक आणि अधिकारी संगनमताने महाराष्ट्रातील तिजोरीची लूट करत असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पत्रात लिहिलं आहे.










