उड्डाणपूल अतिशय अडचणीचा ठरेल, सर्वसामान्यांचा तीव्र विरोध, अखेर नितीन गडकरींचा मोठा निर्णय.

शेवाळी ते नेत्रग महामार्गावरील उड्डाणपूल रद्द करण्यात आला आहे. भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नितीन गडकरी यांच्याकडे या प्रकल्पावर चिंता व्यक्त केली होती. नागरिकांच्या सोयीसाठी गडकरी यांनी निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.नंदुरबार शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. शेवाळी ते नेत्रग महामार्गावरील तुलसी हॉस्पिटलपासून संत कवरदास चौकापर्यंतचा उड्डाणपूल रद्द झाला आहे. भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन या उड्डाणपुलाला विरोध दर्शवला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गडकरी यांनी तत्काळ निविदा रद्द करण्याचे आदेश दिले.
शेवाळी ते नेत्रग महामार्ग अंतर्गत नंदुरबार शहरामध्ये नियोजित तुलसी हॉस्पीटल पासुन संत कवरदास चौक पर्यंतचा उड्डाणपुलची निविदा काढण्यात आली होती. मात्र या उड्डाणपूलास या भागातील व्यापारी तसेच रहिवाशी व भाजपा पदाधिकारी यांनी विरोध केला होता.भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केंद्रिय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नियोजित उड्डाणपुलाची निविदा तात्काळ रद्द केली.शहरातील नवापूर चौफुली, धुळे चौफुली, करण चौफुली आणि सी.बी. पेट्रोल पंप येथे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. मात्र, तुलसी हॉस्पिटल ते संत कवरदास चौकापर्यंतच्या उड्डाणपुलामुळे शहरातील नागरिकांना आणि व्यावसायिकांना खूप त्रास होणार होता. त्यामुळे नागरिकांनी या उड्डाणपुलाला विरोध केला. हा उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही, तसेच तो अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकला असता.या रस्त्यावर शाळा, कॉलेज, मंदिरे आणि वस्ती असल्यामुळे उड्डाणपूल झाल्यास मोठी अडचण निर्माण झाली असती. विजय चौधरी यांनी नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नितीन गडकरी यांना निवेदन दिले.

गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “शहरी भागातील सी.बी. पेट्रोल पंप अर्थात तुलसी हॉस्पिटल पासुन संत कवरदास चौक पर्यंतचा वाहया (डक) पुल, उडडाणपुलाची निविदा रदद करण्याबाबत तसेच पुढील आदेश पर्यंत हे काम स्थगित करण्याचे आदेश” अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे शहरातील उड्डाणपूल रद्द झाल्याने व्यापारी आणि नागरिकांना मोठा दिलासामिळाला आहे.शेवाळी ते नेत्रग महामार्गावरील तुलसी हॉस्पिटलपासून संत कवरदास चौकापर्यंतच्या उड्डाणपूलाच्या निर्मितीला स्थगिती मिळणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारण फायद्याच्या नसलेल्या या उड्डाण पुलाच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारा पैसा वाया गेला असता असे काही नागरिकांनी म्हटले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.