सिंधू जल करार स्थगितीनंतर भारताचा 45260000000 रुपयांचा ‘नवा प्लॅन’, पाकिस्तानचे धाबे दणाणले.

सिंधू नदी पाणी वाटप करारावर भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तान अस्वस्थ आहे. त्यातच, भारत ३११९ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. पाकिस्तानने दहशतवाद थांबवल्याशिवाय पुढील वाटाघाटी होणार नाही असे भारताने स्पष्ट केले आहे.पाकिस्तान सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारावर भारत ाने घेतलेल्या भूमिकेमुळे खूपच अस्वस्थ आहे. त्यातच आता भारताने एक नवीन योजना बनवली आहे. त्यामुळे पाकिस्तानची झोप उडणार आहे. भारत सरकार जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर ‘क्वार’ नावाचा जलविद्युत प्रकल्प वेगाने सुरू करणार आहे. यासाठी ३११९ कोटी रुपये कर्ज घेतले जाणार आहे. एकूण योजनेसाठी 4526 कोटी निधी लागणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार याबाबत माहिती दिली आहे. भारताने सिंधु नदी पाणी वाटप करार स्थगित केल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. यामुळे पाकिस्तानात असलेल्या नदीपात्राच्या भागांमध्ये पाण्याची चिंता वाढली आहे.
भारताची भूमिका यावर्षी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर लगेचच भारताने १९६० पासून सुरू असलेला सिंधु नदी पाणी वाटप करार थांबवला. या करारानुसार, भारतीय क्षेत्रातून वाहणाऱ्या सहा नद्यांपैकी तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला मिळते. भारत सरकारने स्पष्ट सांगितले आहे की, जोपर्यंत पाकिस्तान भारतीय भूभागात दहशतवाद पसरवणे थांबवत नाही, तोपर्यंत हा करार स्थगित राहील.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तैयबा’ या संघटनेच्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ नावाच्या एका गटाने घेतली होती. या हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी पाकिस्तानमध्ये भाषण केले होते. त्यात त्यांनी काश्मीरला पाकिस्तानच्या गळ्यातील नस म्हटले होते. मुनीर यांनी जिन्ना यांच्या द्विराष्ट्र सिद्धांताचा उल्लेख करत सांगितले होते की, “हिंदू आणि मुसलमान हे दोन वेगळे समुदाय आहेत आणि ते एकत्र शांततेत राहू शकत नाहीत.” मुनीर यांच्या भाषणामुळेच काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला झाला, असे मानले जाते.पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडले आहेत. मे महिन्यात दोन्ही देशांमध्ये सैन्य संघर्ष झाला होता. अशा स्थितीत क्वार जलविद्युत प्रकल्प वेगाने सुरू करण्याचा भारताचा निर्णय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प ‘चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेड’ (CVVPL) च्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. ही कंपनी NHPC लिमिटेड आणि जम्मू-काश्मीर राज्य विद्युत विकास महामंडळ यांचा संयुक्त उपक्रम आहे. कर्जासाठी वित्तीय संस्थांशी संपर्क साधला गेला आहे. CVVPL ने ३११९ कोटी रुपयांच्या कर्जासाठी अनेक बँका आणि वित्तीय संस्थांशी बोलणी केली आहे. या पैशातून ५४० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी काही प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.