पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत आजमितीला सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणे शहराची सहा महिन्यांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत आजमितीला सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणे शहराची सहा महिन्यांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणांमध्ये १७.३७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ ‘टीएमसी’ पाणीसाठा अधिक जमा झाल्याची जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील ही पहिलीच वेळ असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासांत किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणात चार मिलिमीटर, पानशेतमध्ये २९ मिमी, वरसगावमध्ये २७ आणि टेमघरमध्ये ४३ मिमी पाऊस झाला आहे. काही दिवसांपूर्वी धरणासह घाटमाथ्यावर पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे जलसंपदा विभागाने खडकवासला प्रकल्पातून विसर्ग करण्यास सुरुवात केली होती. आता हा विसर्ग कमी करण्यात आला आहे. जून महिन्यापासून झालेल्या पावसामुळे आतापर्यंत ३.७७ टीएमसी पाणी धरणातून सोडले आहे.









