रत्नागिरीतील किल्ल्यावरुन पडलेल्या नाशिकच्या ‘त्या’ तरुणीची ओळख पटली, शेवटच्या चिठ्ठीत लिहिलेलं..

रत्नागिरी शहरात भगवती किल्ल्यावर हा धक्कादायक प्रकार घडल्याच समजल्यानंतर तात्काळ पालकमंत्री उदय सामंत यांनीही भगवती किल्ला परिसराकडे अधिकाऱ्यांसमवेत भेट दिली व व परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा नागरिकांच्या सुरक्षा आदीसंबंधित काही सूचना दिल्या.रत्नागिरी शहरातील भगवती किल्ल्यावरून पडलेली ती युवती कोण याचा शोध रत्नागिरी पोलीस घेत होते. मात्र या प्रकरणाचा आता उलगडा झाला आहे. मात्र या पडलेल्या युवतीचा शोध अद्याप लागलेला नाही. ही युवती पडल्यानंतर एका महिलेचा मृतदेह समुद्रात समोर तरंगताना दिसत असतानाची माहिती एका पर्यटकान रत्नागिरी शहर पोलिसांना दिली होती. हा सगळा धक्कादाय प्रकार गेल्या रविवारी सकाळी 11 ते 12 घडला होता. नाशिक येथील एका राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या बँकेत कर्मचारी होती.सुखप्रीत प्रकाश धाडेवाल (वय 25) असं या तरुणीचं नाव होतं. याच युवतीने रत्नागिरीत येऊन ही आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा संशय आहे. भगवती किल्ला समोर ती ज्या ठिकाणी पाय पसरून बसली होती त्या ठिकाणी ओढणी, तिची चप्पल या चीजवस्तू पोलिसांना मिळाल्या होत्या. या वस्तू तिच्या घरच्यांनी रत्नागिरी येथे येऊन ओळखल्या आहेत.

अशा स्वरूपाच्या टोकाचे पाऊल उचलण्याच नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण एकतर्फी प्रेमातून हा धक्कादायक प्रकार घडला असावा असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.हे कुटुंब मूळचे हरियाणातील आहे. मात्र, ते नाशिक येथे वास्तव्यास आहे. सुखप्रीत या युवतीने रत्नागिरी येथे येऊन गेल्या रविवारी भगवती किल्ल्यावरून उडी घेत टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. नाशिक येथून ही बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी नाशिक पोलिसात दिली होती. तिचे आई, वडील, भाऊ, नातेवाईक रत्नागिरी येथे आल्यानंतर त्या अज्ञात तरुणीच्या भगवती किल्ल्यावरून बेपत्ता होण्याचे गूढ उलगडलं आहे. नाशिक येथून रत्नागिरी येथे आलेल्या या युवतीने नाशिक येथील घरी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही सुसाईड नोट रत्नागिरी पोलिसांना तिच्या पालकांनी दिली आहे.त्यामध्ये माझ्या मृत्यूनंतर कोणासही जबाबदार धरू नये, अशा स्वरूपाचा मजकूर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रत्नागिरी येथील एका बँक कर्मचाऱ्याला ती भेटण्यासाठी आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे, मात्र या कर्मचाऱ्याची भेट झालेली नाही.

पण या कर्मचाऱ्याला या युवतीने दुसऱ्याच्या फोनवरून आपल्याला फोन केल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांना दिली होती. भगवती किल्ल्याच्यासमोर असलेल्या ठिकाणी ही युवती बसली होती. त्यानंतर ती दिसेनाशी झाली मात्र ती बसली होती.या सगळ्या धक्कादायक प्रकरणानंतर रत्नागिरी पोलिसांनी याची गंभीर दखल घेत शहर पोलीस ठाण्याचे सतीश शिवरकर यांनी तात्काळ भगवती किल्ल्याकडे धाव घेत आपत्कालीन सुरक्षायंत्रणांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले होते. या सगळ्या प्रकरणाची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.