‘त्या’ रात्री काय घडलं?, 9 मुलांच्या आईचं कंत्राटदारासोबत अफेअर, नवरा आवडेनासा झाला अन्…महिलेने सगळंच सांगितलं.

रीना आणि हनिफचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिचा पती रतिरामला त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. म्हणूनच रीनाने तिच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केली. काय आहे हे प्रकरण? कसा झाला प्रकरणाचा खुलासा? जाणून घेऊया सविस्तर.एका आठवड्यापूर्वी ९ मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केली आणि मृतदेह ट्यूबवेलवर लटकवला. आता पोलिसांनी आरोपी महिला रीना आणि तिचा प्रियकर हनिफला अटक केली आहे. चौकशीदरम्यान असे उघड झाले की रीना आणि हनिफचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिचा पती रतिरामला त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. म्हणूनच रीनाने तिच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केली. काय आहे हे प्रकरण? कसा झाला प्रकरणाचा खुलासा? जाणून घेऊया सविस्तर.

२४ जून रोजी उत्तर प्रदेशातील कासगंज येथून हे प्रकरण उघडकीस आले. रतीराम त्याची पत्नी रीना आणि मुलांसह वीटभट्टीवर काम करण्यासाठी पटियाली पोलिस स्टेशन परिसरातील भरगाईं गावात रहायला आला होता. मृताचा भाऊ अरविंदने पोलिसांना सांगितले की रीनाचे माहेरचे घर भरगाईंमध्येच आहे आणि तिचे येथे राहणाऱ्या एका वीटभट्टीवर कंत्राटदार असलेल्या हनीफशी अवैध संबंध आहेत. अरविंदने असेही सांगितले की, जेव्हा रतीरामला रीना आणि हनीफबद्दल कळले तेव्हा दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर रीना आणि हनीफने रतीरामची हत्या केली.रीना आणि रतीराम यांना ९ मुले आहेत. त्यापैकी तीन मुलांची लग्ने झाली होती. तरीही रीना तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या हनिफच्या प्रेमात पडली. रीना हनिफच्या प्रेमात इतकी गुंतली की, तिने त्यांच्या प्रेमात अडथळा ठरलेल्या पतीची हत्या केली. चौकशीदरम्यान रीनाने सांगितले की तिचे हनिफसोबतचे प्रेमसंबंध तीन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. या तीन वर्षांत ती हनिफसोबत तीन वेळा पळून गेली. पण नंतर ती तिची चूक कबूल करून आणि पतीला आश्वासन देऊन परत येत असे.रीना पुढे म्हणाली की, तिच्या पतीच्या विरोधाला न जुमानता, ती आणि हनीफ एकमेकांना भेटत राहिले. पण तिचा पती रतीरामने यामुळे वाद घालायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत हनीफ आणि रीना यांनी प्रथम पतीपासून सुटका मिळवण्यासाठी एक योजना आखली. योजनेनुसार, १८ जून रोजी रीना बहाण्याने रतीरामला भरगाईं येथील शेतात घेऊन गेली. हनीफ आधीच तिथे लपून बसला होता. रतीराम शेतात पोहोचताच हनीफने त्याला पकडले.यानंतर दोघांनी मिळून रतीरामला खाली पाडले. हनीफने रतीरामचा गळा दाबून खून केला. रतीराम धडपडू लागला आणि जीव वाचवण्यासाठी त्याचे हातपाय हलवू लागला, त्यानंतर रीनाने त्याचे हात घट्ट धरले आणि रतीराम मरेपर्यंत सोडले नाहीत. यानंतर, दोघांनीही रतीरामला ट्यूबवेलवर लटकवले जेणेकरून खून आत्महत्येसारखा वाटेल.२४ जून रोजी पतीचा मृतदेह सापडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. रतीरामचा भाऊ अरविंदने रीना आणि हनीफवर हत्येचा आरोप केला. तेव्हापासून पोलिसांनी रीना आणि हनीफचा शोध सुरू केला. आता सोमवारी, एसओजी आणि दक्षता पथकाने पटियाली कोतवाली पोलिसांसह संयुक्त कारवाई करत दोघांनाही अटक केली. पोलिसांनी सांगितले की, दर्यागंज रेल्वे स्थानकाजवळ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हनीफचा रक्ताने माखलेला टी-शर्ट जप्त करण्यात आला आहे. आता दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.