शिंदेंना बंडाची भीती? सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाचा प्रस्ताव; भाईंनी पाचर मारली.

राज्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सावध भूमिका घेत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.मुंबई: तीन वर्षांपूर्वी राज्यात उद्धव ठाकरे ंच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं. या बंडानंतर उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय वाताहत झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात पक्षात सर्वात मोठं बंड झालं. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर पक्ष आणि चिन्हदेखील ठाकरेंच्या हातून गेलं. आता शिंदे यांनादेखील तशाच फुटीची भीती वाटत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेत्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मांडलेला एक प्रस्ताव लक्षवेधी ठरला आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल संपन्न झाली. त्यात काही महत्त्वाचे ठराव मांडले गेले. यातील शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनाचा प्रस्ताव सर्वाधिक लक्षवेधी ठरला. पक्षफुटीचा उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठा फटका बसला. बहुतांश आमदार, खासदारांनी त्यांची साथ सोडली. नेत्यांनीदेखील शिंदेसेनेची वाट धरली. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक मध्यवर्ती कार्यालयं आणि शाखांवर शिंदेसेनेत गेलेल्या नेत्यांनी दावे सांगितले. त्यामुळे ठाकरे आणखी अडचणीत आले.पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या हातून अनेक मध्यवर्ती कार्यालयं आणि शाखा कशा निसटल्या, याची पूर्ण कल्पना एकनाथ शिंदेंना आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे यांनी सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

सेनेचे आमदार, खासदार, नेते फुटल्यावर स्थानिक पातळीवरील पक्षाची कार्यालयं, शाखा शिंदेसेनेकडे गेल्या. या कार्यालयं, शाखांवर शिंदेंकडे गेलेल्या नेत्यांनी दावा सांगितला. त्यामुळे ठाकरेंवर नामुष्की ओढवली.ठाकरेंसोबत घडलेला प्रकार पाहून शिंदे यांनी धडा घेतलेला आहे. भविष्यात तसा प्रकार आपल्या पक्षासोबत घडू नये यासाठी शिंदेसेनेच्या काल झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला. पक्षाचे कार्याध्यक्ष आणि आमदार बालाजी किणीकर यांनी विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला.शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालयं आणि शाखा या शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या अंतर्गत येतील. त्यांचं व्यवस्थापन विश्वस्त संस्थेकडून पाहिलं जाईल. पक्षनिधी, गरजूंना मदत, पक्षाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या इतर कार्यक्रमांचं आयोजन संस्थेकडून केलं जाईल. पक्षाकडून केली जाणारी समाजपयोगी, लोकपयोगी कामंदेखील संस्थेकडून केली जातील.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.