दारुच्या व्यसनामुळे संसाराचे तीन-तेरा, क्षुल्लक कारणावरुन तरुणाने थेट चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं, काय घडलं नेमकं?

सोन्यासारख्या आयुष्याचे दारुच्या अती व्यसनापायी तीन तेरा वाजतात हेच खरे. एका तरुणाने दारूच्या नशेत स्वतःचं आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जितेंद्र त्याची पत्नी पूजासोबत त्याच्या आयडीए फ्लॅटमध्ये राहत होता . शनिवारी रात्री तो दारू पिऊन घरी पोहोचला आणि त्याने त्याच्या पत्नीशी भांडायला सुरुवात केली.दारूचे व्यसन संपूर्ण कुटूंब उद्धवस्त करते हे काही खोटे नाही. व्यसनाधीन झालेला माणूस नशेपायी कधी काय पाऊल उचलेल याचा नेम नाही. सोन्यासारख्या आयुष्याचे दारुच्या अती व्यसनापायी तीन तेरा वाजतात हेच खरे. एका तरुणाने दारूच्या नशेत स्वतःचं आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

इंदूर जिल्ह्यातील द्वारकापुरी पोलीस स्टेशन परिसरातील अहिरखेडी भागात ही दुःखद घटना घडली. घरगुती वादानंतर दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मृताचे नाव जितेंद्र मेघवाल (२५) असे आहे. तो व्यवसायाने कामगार होता आणि दारूच्या नशेत तो त्याच्या पत्नीशी अनेकदा भांडत असे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २८ जूनच्या रात्री घडली. जितेंद्र त्याची पत्नी पूजासोबत त्याच्या आयडीए फ्लॅटमध्ये राहत होता . शनिवारी रात्री तो दारू पिऊन घरी पोहोचला आणि त्याने त्याच्या पत्नीशी भांडायला सुरुवात केली. दरम्यान, त्याची पत्नी स्वयंपाकघरात भांडी धुत होती. काही वेळानंतर, जितेंद्र खोलीत बसला आणि नंतर अचानक बाल्कनीकडे गेला. काही वेळातच त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.जवळच्या लोकांनी त्यांच्या बाल्कनीतून ही संपूर्ण घटना पाहिली. त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आरडा ओरड केली, पण तो थांबला नाही. घटनेनंतर शेजाऱ्यांनी ताबडतोब त्याची पत्नी, सासू आणि वहिनीला कळवले. दारूच्या नशेत उंचावरुन उडी मारल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की जितेंद्रला बऱ्याच काळापासून दारूचे व्यसन होते आणि तो अनेकदा त्याच्या पत्नीशी भांडत असे. घटनेच्या रात्री तो पूजाला मारहाण करण्याचा प्रयत्नही करत होता. जितेंद्रला तीन वर्षांची मुलगी देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही त्याच इमारतीत राहतात.ही इमारत आयडीए योजनेअंतर्गत गरिबांसाठी बांधण्यात आली आहे. द्वारकापुरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि गुन्हा दाखल केला. रविवारी मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला. सध्या इंदूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.