माळेगावच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली, अजित पवारांचा गौप्यस्फोट.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रराव तावरे यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी मध्यस्थी केल्याचा गौप्यस्फोट केला. महायुतीमध्ये एकत्र असल्यामुळे फडणवीसांनी समजूत काढण्यास सांगितल्याचे पवारांनी सांगितले. तसेच, शरद पवार यांच्या पक्षाकडूनही जागांसाठी निरोप आला होता, पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.

माळेगावमधील भाजपचे स्थानिक नेते चंद्रराव तावरे यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती, असा खुलासा अजित पवार यांनी केला. “माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकी संदर्भात आपण काही बोललो नव्हतो, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात, आपण महायुतीमध्ये एकत्र आहोत, तर तुम्हाला थोडे समजून घ्यावे लागेल. त्यानंतर आपण गप्प बसलो आणि तेव्हा हा चर्चेचा विषय पुढे आला”, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विजयाच्या यशाबद्दल आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.”पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एन जगताप माझ्याकडे आले होते. सहा जागा द्या असे म्हणाले होते. मी त्यांना दोन जागा देतो असे म्हणालो होतो आणि एक जागा स्वीकृत संचालक देतो असे म्हणालो होतो. त्यांनी या जागेला संमती दर्शवली होती, त्यानंतर पुन्हा मी राजवर्धन शिंदे यांना सूचना केली. तेव्हा मात्र त्यांनी हे जमणार नाही असे सांगितले. नवीन नवीन मुद्दे ते काढू लागले”, असाही खुलासा अजित पवार यांनी केला.”माळेगावच्या सभासदांनी हे लक्षात घेतले पाहिजे, मी कुठेही टोकाची भूमिका घेतली नव्हती. पण ज्यावेळी माझ्या लक्षात आले की मला पॅनलच करावा लागेल, त्यावेळीही माझ्या मनात कुठेही मला संचालक किंवा अध्यक्ष व्हायचे नव्हते. मात्र माझ्या स्पर्धेमध्ये सहा ते सात लोक चेअरमन पदासाठी इच्छुक होते. त्यामुळे मला माझीच नाव पुढे करावे लागले”, असादेखील खुलासा अजित पवार यांनी केला.”त्यातच बरेच जण अध्यक्षपदाचे नाव जाहीर करू नका म्हणत होते. अनेकांचे हेवेदावे आहेत. प्रत्येकाला चेअरमन व्हायचे आहे, कोणी ऐकायला तयार नाही. त्यामुळे अध्यक्षपद नाव जाहीर करू नका, असे मला सांगत होते. त्यावर मात्र मी विचार करत पुढारी माझ्या बाजूने नाही हे माझ्या लक्षात आले होते. मी कितीही त्यांना पदे दिली की तेवढ्यापुरती असते दादा दादा करतात. मात्र पुढाऱ्यांनी जरी काहीही केले, तरी बारामतीला सर्वसामान्य माणूस माझ्या पाठीशी आहे, मग माझ्या नावाने विचार केला”, असं अजित पवार म्हणाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.