राज्यातील सर्वांचा विरोध असतानाही तो डावलत पहिल्या इयत्तेपासून राज्यात तिसरी भाषा शिकवली जाणारच, असा निर्धार शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. पहिल्या दोन इयत्तांसाठी तिसऱ्या भाषेचे हे शिक्षण मौखिक असून, ते बडबडगीते, खेळ अशा माध्यमांमधून दिले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.










