कोकणात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अद्याप रखडला आहे. वादग्रस्त ठरत असलेल्या पालकमंत्री पदाचे कोडे महायुतीच्या नेत्यांना सोडवता आलेले नाही. यातच मंत्री आदिती तटकरे यांनी एका कार्यक्रमात याबद्दल आपली खंत व्यक्त केली आहे. कोकणात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अद्याप रखडला आहे. महायुतीमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री भरत गोगावले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकमंत्री पदावर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे वादग्रस्त ठरत असलेल्या पालकमंत्री पदाचे कोडे महायुतीच्या नेत्यांना सोडवता आलेले नाही. यातच मंत्री अदिती तटकरे यांनी एका कार्यक्रमात याबद्दल आपली खंत व्यक्त केली आहे. ‘रायगड जिल्ह्याला काही राजकीय समज गैरसमजामधून पालकमंत्री पद मिळालेलं नाही’ असे भाष्य तटकरेंनी केले. त्या रायगड जिल्ह्यात रोहा येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकारिणी आढावा सभेत बोलत होत्या.
अदिती तटकरे म्हणाल्या, रायगड जिल्ह्याला काही राजकीय समज गैरसमजामधून पालकमंत्री पद मिळालेलं नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार योग्य निर्णय घेतील. मात्र आम्ही कार्यकर्त्यांना मतदारांना विकासकामांचे शब्द दिले आहेत, त्यापासून अधिक काळ वंचित ठेवता येणार नाही. विकासकामांपासून तरी आम्हाला वंचित ठेवू नका, अशा स्वरूपाची विनंती आपण लोकप्रतिनिधी व एक कनिष्ठ सहकारी म्हणून महायुतीच्या नेतृत्वाला केली आहे. पालकमंत्री पद नसल्याने जिल्हा नियोजनाची बैठक ही अजून झालेली नाही त्यामुळे निधी अभावी राहाव लागत असल्याची खंत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.पालकमंत्री नसल्यामुळे अनेक अन्य तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींना विकासासाठी असलेला निधी प्राप्त होत नाही आहे, असेही तटकरेंनी नमूद केले. तर आम्हाला विकासात्मक दृष्ट्यातरी वंचित ठेऊ नका, अशी विनंती आपण महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना एक लोकप्रतिनिधी व कनिष्ठ सहकारी म्हणुन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.पालकमंत्रीपदाचा निर्णय एका बाजूला हे तीनही महायुतीचे नेतृत्व जेव्हा घ्यायचे तेव्हा घेतील पण आम्ही कार्यकर्त्यांना मतदारांना दिलेले विकासाचे शब्द यापासून अधिक काळ वंचित ठेवू शकत नाही. ही विनंती आपण केल्याची माहिती त्यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली. मंत्री आदिती तटकरे यांच्या या विधानानंतर आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय केव्हा होतो, हे पाहणे सगळ्यात महत्त्वाच्या ठरणार आहे.









