दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीने पंजाब आणि गुजरात पोटनिवडणुकीत जोरदार पुनरागमन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी या विजयानंतर भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला असून, जनतेने दोघांनाही नाकारल्याचे म्हटले आहे.दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाची अवस्था बिकट झाली आहे असे बोलले जात होते. पण राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आप ने कमबॅक केले आहे. पंजाबमध्ये आपने जोरदार विजय मिळवत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. गुजरातमध्ये विसावदर सीटवर आपने विजय मिळवून भाजपची चिंता वाढवली आहे. या दोन जागांवर मिळालेला विजय आपसाठी नवसंजीवनी ठरली आहे.
दिल्लीत हरल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचे राजकारण आता संपले, असे म्हटले जात होते. पण त्यांनी जोरदार पुनरागमन केले आहे. दिल्लीतील पराभवानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात, गुजरातमध्ये आपनेने जागा जिंकणे आश्चर्यकारक आहे. या विजयामुळे आपकडून स्थानिक पातळीवर काम केले जात असल्याचे दिसते.पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपचा विजय झाला आहे. आपचे उमेदवार संजीव अरोड़ा यांनी काँग्रेसचे भारत भूषण आशु यांचा 10637 मतांनी पराभव केला.गुजरातच्या विसावदर विधानसभा जागेवर आपचे गोपाल इटालिया जिंकले. त्यांना एकूण 75942 मते मिळाली. त्यांनी भाजपचे किरीट पटेल यांचा 17554 मतांनी पराभव केला. तर, गुजरातच्या कडी सीटवर भाजपचे राजेंद्र चावड़ा 39452 मतांनी जिंकले. त्यांनी काँग्रेसचे के. रमेश चावड़ा यांचा पराभव केला.









