सहा महिन्यातच सुनील गावस्करांचा सुर बदलला; पंतच्या शतकानंतर स्टुपिड नाही तर काय म्हणाले ऐकाच…

भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. पहिल्या सामन्याच्या दुसरा दिवसही संपला आहे. भारताने प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम सत्रात संघ 471 वर सर्वबाद झाला. ऋषभ पंतच्या शतकावर सुनील गावस्करांनी एक मोठे विधान केले आहे.भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. पहिल्या सामन्याच्या दुसरा दिवसही संपला आहे. भारताने प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम सत्रात संघ 471 वर सर्वबाद झाला. भारताकडून तीन फलंदाजांनी शतक झळकावले. ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांनी शतक ठोकले. ऋषभ पंतच्या शतकावर सुनील गावस्करांनी एक मोठे विधान केले आहे.

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने शानदार शतक झळकावले. हे पाहून माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांचा सूर बदलला. त्यांनी पंतचे कौतुक केले आणि त्याला Superb म्हटले. गावस्कर यांनी अवघ्या 6 महिन्यांपूर्वी पंतला मूर्ख म्हटले होते. 6 महिन्यांपूर्वी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. त्यानंतर 26 ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान मेलबर्नमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने अतिशय वाईट शॉट खेळून आपली विकेट गमावली.कमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेले दिग्गज सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंतवर जोरदार टीका केली होती. पंतचा वाईट शॉट पाहून ते रागात तीन वेळा मूर्ख, मूर्ख, मूर्ख असे म्हणाला. त्याचा व्हिडिओही बराच व्हायरल झाला.

आता यानंतर सुमारे 6 महिन्यांनी, ऋषभ पंतने इंग्लंड दौऱ्यावर एक शानदार शतक झळकावले. हे पाहून सुनील गावस्कर पंतचे चाहते झाले. एवढेच नाही तर गावस्कर यांनी पंतचे कौतुक करताना तीन वेळा ‘सुपरब, सुपरब, सुपरब’ असे म्हटले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताच्या या डावात तीन फलंदाजांनी शतके केली. सलामीवीर यशस्वी जयस्वालने 101 धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने 147 धावा केल्या. पंतने 134 धावांची शानदार खेळी केली. या शतकी खेळीमुळे ऋषभ पंतने एमएस धोनीला मागे टाकले. तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतके करणारा विकेटकीपर फलंदाज ठरला. यासोबतच, तो सात देशांमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय विकेटकीपर फलंदाजही ठरला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.