नाशिककर ‘धारे’वर! जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, आजही यलो अलर्ट.

त्र्यंबकेश्वरमध्ये १४२, सुरगाण्यात १०१, इगतपुरीत ७२, तर दिंडोरीत ६९ मिमी पाऊस झाला. बागलाण आणि नाशिकमध्येही ४५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला.शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पेठ, सुरगाण्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यांत २४ तासांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. नार, पारसह अनेक नद्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिकमध्ये यंदा प्रथमच गोदावरीला पूर आला असून, दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वर पाणी पोहोचले.दारणा, पूनद आणि नांदूरमध्यमेश्वरमधून विसर्ग सुरू झाला आहे. शहरात सकाळी साडेआठ ते साडेपाच या नऊ तासांत ६०.४ मिलिमीटर पाऊस झाला असून, गंगापूरमधूनही शुक्रवारी विसर्ग केला जाणार आहे. दरम्यान, ओझर येथे मासेमारीसाठी गेलेला विठ्ठल शिंगाडे हा तरुण कॅनॉलमध्ये वाहून गेला सुरगाण्यातही घराची पडझड झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हवामान विभागाने शुक्रवारीही पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान, ओझर येथील भगतसिंग नगर येथील विठ्ठल शिंगाडे (वय ३६) हा तरुण चारी क्रमांक १६ येथील कॅनॉलमध्ये मासेमारी करण्यासाठीगेला होता. मात्र, हा तरुण कॅनॉलमध्ये वाहून गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.सुरगाणा तालुक्यातील उदमाळ येथील शिमगू चौधरी यांच्या घराची अतिवृष्टीमुळे पडझड झाली. पेठ तालुक्यात सर्वाधिक १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

त्र्यंबकेश्वरमध्ये १४२, सुरगाण्यात १०१, इगतपुरीत ७२, तर दिंडोरीत ६९ मिमी पाऊस झाला. बागलाण आणि नाशिकमध्येही ४५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला.मुसळधार पावसामुळे सुरगाण्यातील उदमाळ येथे एका घराची पडझड झाली. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातील पाण्याचा विसर्ग ११०० क्युसेकवरून ३०६२ क्युसेक करण्यात आला. पुनदमधून १२०० क्युसेकने तर नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३२२८ क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे.गंगापूर धरण ५० टक्के भरले असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. २०) सकाळी सहाला ५०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे, तर सकाळी नऊपासून एक हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अनेक तालुक्यांमध्ये सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाने काही धरणांमधून विसर्ग सुरू केला आहे. दारणासह पुनद धरणातून विसर्ग सुरू झाला असून, शुक्रवारी सकाळी सहापासून गंगापूर धरणातूनही विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवणसह अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे. यामुळे नारपार, दारणासह अनेक नद्यांना पूर आला आहे. नद्यांची पातळी वाढली असून, धरणांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ होत आहे.

जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधारेमुळे पावसाने जूनची सरासरी ओलांडली. सर्वदूर झालेल्या पावसामुळे जूनमधील पहिल्या १९ दिवसांतच १०७ टक्के पाऊस नोंदविला गेला. इगतपुरीवगळता अन्य १४ तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नार, पारसह अनेक नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तूटला आहे. नाशिक जिल्ह्यात मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवत हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अॅलर्ट जारी केला होता. शहरासह जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सर्वच तालुक्यांमध्ये दमदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सरासरी ४०.३ मिमी पाऊस झाला. पावसाचा हा जोर गुरुवारीही सकाळपासून कायम राहिला. त्यामुळे जिल्ह्यात जूनमध्ये होणाऱ्या पावसाची सरासरी ओलांडली गेली आहे.१ जून ते ३० जून या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ११०.५ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित आहे. मात्र, १ ते १९ जून या कालावधीत ११८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच १०७.४ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. निफाडमध्ये ६५ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना १२४.७ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच सरासरीच्या १९१.९ टक्के पाऊस झाला आहे. येवल्यात १७८.१ टक्के पाऊस झाला असून, सर्वांत कमी पाऊस इगतपुरीत ४५ टक्के झाला आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..