तुम्ही निष्ठावंत; एक गोष्ट विचारु? ‘मातोश्री’ बैठकीत उद्धव ठाकरेंचा प्रश्न, माजी नगरसेवकांची कळी खुलली.

 तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात. येत्या काळात आपल्याला अनेक बैठका घ्यायच्या आहेत. येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागू शकते, असं उद्धवमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला उधाण आले असतानाच उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी यासंदर्भात पक्षाच्या माजी नगरसेवकांची मते जाणून घेतली. त्यावर मनसेशी युती केली तर फायदाच होईल. मुंबईत युतीसाठी अनुकूल वातावरण आहे, असा सूर अनेकांनी व्यक्त केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. आज ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने कुठली घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ठाकरे म्हणाले‘मातोश्री’ या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पक्षाची बैठक झाली.

यावेळी ठाकरे यांनी मनसेसोबत युती करायची की नाही, याबाबत माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना विचारले. त्यावर त्यांनी युतीबाबत सकारात्मकता दाखवली. मुंबई महापालिकेसाठी एका पक्षाशी युती करायची की आघाडी करायची, याचा निर्णय तुम्हाला विश्वासात घेऊनच घेतला जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्याचे समजते.तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात. येत्या काळात आपल्याला अनेक बैठका घ्यायच्या आहेत. येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागू शकते. त्यामुळे शिवसेना भवन येथे उपस्थित राहत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही वेळ द्या, लवकरच शिवसेना भवनात निवडणूक कार्यालय उघडणार आहोत,

असेही या बैठकीमाजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी बैठकीच्या वृत्ताला दुजोरा देताना सध्या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित आंदोलन करत असून एकत्र कामही करत असल्याचे सांगितले.मध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते.नगरसेवकांची मुदत संपल्याने मागील तीन वर्षांपासून सर्व निर्णय प्रशासनच घेत आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने नगविकास विभागाच्या माध्यमातून ठिकठिकाणी घोटाळे केले आहेत. हा सर्व गैरव्यवहार भाजपला बाहेर काढायचा आहे. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर जे काही घोटाळे बाहेर निघतील ते शिंदे यांच्याच पक्षाचे निघणार असल्याने भाजपला निवडणुका घेण्यात स्वारस्य असल्याचा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावल्याचे समजते.

  • Related Posts

    जनतेच्या सुख दु:खात सतत सहभागी होणाऱ्या व्यक्तिमत्वाला एक संधी द्याच — राजेंद्र सुकलाल निकम

    जनतेच्या सुख दु:खात सतत सहभागी होणाऱ्या व्यक्तिमत्वाला एक संधी द्याच — राजेंद्र सुकलाल निकम राजेंद्र सुकलाल निकम हे हरीविठ्ठल नगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून जनतेच्या हिताची काम करत असून त्यांनी…

    सिंधी कॉलनी तरुणांच्या हाती मनसेचा झेंडा;बदलाची हाक! राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास..

    सिंधी कॉलनी तरुणांच्या हाती मनसेचा झेंडा;बदलाची हाक.. राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास.. जळगाव : सिंधी कॉलनी परिसरातील उत्साही तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेत पक्षात जंगी प्रवेश केला. बदलाची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..