कैलास कोरडे शिवना टाकळी प्रकल्प अंतर्गत पावलोट क्षेत्रातील हतनूर ते जैतापूर शिवारातील हद्दीलगत वाघ नाल्यातून बैलगाडीसह आपल्या मुलीकडे पळसवाडी येथे गेले होते.तालुक्यातील शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राच्या पाण्यामध्ये जैतापूर येथील कैलास उत्तमराव कोरडे (वय ५६) या शेतकऱ्याचा बैलगाडीसह बुडाल्याची घटना सोमवारी (१६ जून) सांयकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत शेतकऱ्यासह एका बैलाचा मृत्यू झाला तर एक बैल वाचला आहे.










