…तर गांधी जयंतीला भगतसिंहगिरी करु! बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम; अन्नत्याग आंदोलन स्थगित.

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरु केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन सरकारची भूमिका मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.अमरावती: प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेलं आंदोलन स्थगित केलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं उपोषण सुरु होतं. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेत सरकारची बाजू मांडली. यानंतर कडू यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. २ ऑक्टोबरपर्यंत सरकारनं कर्जमाफीची तारीख सांगावी. अन्यथा गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करु, मंत्रालयात घुसू, असा थेट इशारा कडू यांनी दिला. कडू यांचं आंदोलन अमरावतीत सुरु होतं.

पेरणीचे दिवस आहेत. डोक्यावर पाऊस आहे. त्यासोबत कार्यकर्त्यांच्या भावनादेखील महत्त्वाच्या आहेत. तुम्ही अन्नत्याग आंदोलन सोडा. अन्यथा आम्ही आत्महत्या करु, अशा आशयाचं २०० ते ३०० मेसेज मला आलेले आहेत. काल प्रहारचा एक कार्यकर्ता जीव देण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढला होता. कार्यकर्त्यांच्या भावना आणि डोक्यावर असलेला पाऊस पाहता अन्नत्याग आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याची घोषणा कडू यांनी केला. मंत्री उदय सामंत आणि एका विधवा महिलेच्या हातून पाणी पित बच्चू कडू यांनी आंदोलन सोडलं. पण यावेळी त्यांनी सरकारला २ ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिला.उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काहीच बोलत नव्हते. त्यांनी तर हातच झटकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीवर बोलत नव्हते. पण या सगळ्यांना आपण कर्जमाफीवर बोलायला भाग पाडलं. हा आपल्या आंदोलनाचा विजय असल्याचं म्हणत कडू यांनी उपस्थितांचे आभार मानले. अन्नत्याग आंदोलन मागे घेतलेलं नाही. तर ते केवळ स्थगित केलेलं आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उदय सामंतजी तुमच्या घराबाहेर आंदोलन करु, असा इशारा कडू यांनी दिला.आंदोलन स्थगित करत असताना कडू यांनी दोन प्रमुख गोष्टींचा उल्लेख केला. शेतकऱ्यांकडून होणारी कर्जाची सक्तीची वसुली ८ दिवसांत थांबवा. जर कोणी गावात वसुलीसाठी आला, तर त्याला झाडाला बांधा. कर्ज वसुली करायचीच असेल तर अदानी, अंबानींकडून करा. पेरणीची हंगाम आलेला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे थकित कर्जदारांना नव्यानं कर्ज द्या. हा विषयदेखील ८ दिवसांत मार्गी लावा, अशी मागणी कडू यांनी केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.