रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका सोळा वर्षीय विद्यार्थ्यांचा विंचूदंशामुळे मृत्यू झाला. सोहम शिर्के असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला तातडीने आरोग्य केंद्रात नेले, पण डॉक्टर उपलब्ध नव्हते. आरोग्य विभागाने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस पाठवली आहे.पावसाळ्याच्या दिवसात सरपंच विंचू दहशत सारख्या मोठ्या घटना कोकणात घडत असतात. यामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीवही जातो. खेड तालुक्यात तळे येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. नुकताच दहावी झालेल्या एका विद्यार्थ्यांचा विंचूदंशाने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोहम मंगेश शिर्के (वय – १६) या विद्यार्थ्यांचे विंचूदंशाने उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे सुमारास मृत्यू झाला आहे. ११ जून रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान विंचू दंश झाला होता यावेळी त्याला घरच्यांनी तातडीने तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र यावेळी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथील सोहम मंगेश शिर्के (वय – १६) या विद्यार्थ्यांचे विंचू दंशाने उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे सुमारास मृत्यू झाला आहे. सोहम शिर्के याला ११ रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान विंचू दंश झाला होता. त्याला नातेवाईकांनी नजीकच्या तळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले. मात्र यावेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला प्रथमोपचार करून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला डेरवण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोहम शिर्के हा तळे हायस्कूल येथून यावर्षी दहावी उत्तीर्ण झाला होता.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी तातडीने गंभीर दाखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी तळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या त्यावेळी अनुपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती खेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी दिली आहे.










