ठाकरेंची ‘बहीण’ निष्ठावंतावर भारी; दुसऱ्यांदा हुकलेल्या संधीची इनसाईड स्टोरी, डाव कसा फिरला?

 ठाकरेसेनेच्या उपनेत्या आणि राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांचा केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात झालेला समावेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून झाल्याची माहिती उजेडात आलेली आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारनं सात शिष्टमंडळं तयार केली. त्यात प्रियंका चतुर्वेदींचा समावेश करण्यात आलेला आहे.मुंबई: ठाकरेसेनेच्या उपनेत्या आणि राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांचा केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात झालेला समावेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून झाल्याची माहिती उजेडात आलेली आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारनं सात शिष्टमंडळं तयार केली. त्यात प्रियंका चतुर्वेदींचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात खासदार अनिल देसाईंचा समावेश व्हावा यासाठी ठाकरे आग्रही होते. पण चतुर्वेदी यांनी स्वत:ची वर्णी लावून घेतली. या सगळ्याचा घटनाक्रम समोर आलेला आहे.ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आणण्यासाठी भारत सरकारनं सर्वपक्षीय शिष्टमंडळांची निर्मिती केली. यामध्ये सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे. काँग्रेसनं सुचवलेल्या नावांना बाजूला सारत केंद्र सरकारनं शशी थरुर यांचा समावेश शिष्टमंडळात केला. इतकंच नव्हे, तर त्यांच्याकडे शिष्टमंडळाचं नेतृत्व देण्यात आलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सत्ताधाऱ्यांनी निश्चित केलेल्या युसूफ पठाण यांच्या नावास विरोध केला.

त्यांच्या जागी अभिषेक बॅनर्जी यांच्या नावाची शिफारस केली. केंद्रानं नावं निश्चित करताना संबंधित खासदारांच्या नेतृत्त्वाशी संवाद साधला नसल्याचं काँग्रेस, तृणमूल काँग्रेसकडून सांगण्यात आलं. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतही असाच प्रकार घडला.ठाकरेंच्या पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी निश्चित केलं. आपलं नाव निश्चित झाल्याची माहिती खुद्द चतुर्वेदी यांनीच पक्षप्रमुखांना दिली. त्यावर पक्षाकडून कोण परदेशी जाणार हे ठरवण्याचा अधिकार आपला असल्याची भूमिका ठाकरेंनी घेतली. आपला पत्ता कट होणार असल्याचं लक्षात येताच चतुर्वेदी यांनी रिजीजू यांना ठाकरेंना फोन करण्यास सांगितला, असा घटनाक्रम सुत्रांनी सांगितला. यानंतर केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी ठाकरेंना फोन केला.आपले खासदार परदेशांमध्ये जाऊन काय भूमिका मांडणार, हे स्पष्ट झाल्याशिवाय त्यांना कसं पाठवायचं, असा प्रश्न यानंतर निर्माण झाला. मग परराष्ट्र मंत्रालयानं खासदार कोणती भूमिका मांडणार याची माहिती ठाकरेसेनेला दिली. त्यानंतर चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. पण या सगळ्यात ठाकरेंचे निष्ठावंत असलेल्या देसाईंची संधी हुकली. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेल्या आणि थेट खासदार झालेल्या चतुर्वेदी मात्र बाजी मारुन गेल्या. खासदार झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पक्षप्रवेशाची आठवण सांगितली होती. ‘आज माझ्यासाठी एक बहीण आलीय,’ असं ठाकरे पक्षप्रवेशावेळी ठाकरे म्हणाले होते, अशी आठवण चतुर्वेदींनी सांगितली होती.केंद्रात २०१४ मध्ये मोदींचं सरकार आलं. त्यावेळी अनिल देसाई यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार असल्याचं निश्चित झालं. पण ठाकरेंनी ऐनवेळी विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतल्यानं देसाई यांचा शपथविधी सोहळा झालाच नाही. त्यांचं मंत्रिपद हुकलं. त्यावेळी देसाई राज्यसभेचे खासदार होते. आता ते लोकसभेचे खासदार आहेत आणि परदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश झालेला नाही. त्यांची संधी पुन्हा एकदा हुकली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.