ठाकरेसेनेच्या उपनेत्या आणि राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांचा केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात झालेला समावेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून झाल्याची माहिती उजेडात आलेली आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारनं सात शिष्टमंडळं तयार केली. त्यात प्रियंका चतुर्वेदींचा समावेश करण्यात आलेला आहे.मुंबई: ठाकरेसेनेच्या उपनेत्या आणि राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांचा केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात झालेला समावेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून झाल्याची माहिती उजेडात आलेली आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारनं सात शिष्टमंडळं तयार केली. त्यात प्रियंका चतुर्वेदींचा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात खासदार अनिल देसाईंचा समावेश व्हावा यासाठी ठाकरे आग्रही होते. पण चतुर्वेदी यांनी स्वत:ची वर्णी लावून घेतली. या सगळ्याचा घटनाक्रम समोर आलेला आहे.ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आणण्यासाठी भारत सरकारनं सर्वपक्षीय शिष्टमंडळांची निर्मिती केली. यामध्ये सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे. काँग्रेसनं सुचवलेल्या नावांना बाजूला सारत केंद्र सरकारनं शशी थरुर यांचा समावेश शिष्टमंडळात केला. इतकंच नव्हे, तर त्यांच्याकडे शिष्टमंडळाचं नेतृत्व देण्यात आलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सत्ताधाऱ्यांनी निश्चित केलेल्या युसूफ पठाण यांच्या नावास विरोध केला.










