पुण्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली. तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्या. वैष्णवीच्या लग्नात ५१ तोळे सोने देण्यात आले होते.पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आलीये. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. वैष्णवीवर कशाप्रकारे अत्याचार केली जात होती, याचा पाडाच तिच्या आई वडिलांनी वाचलाय. हेच नाही तर वैष्णवीने आत्महत्या केली असे तिच्या कुटुंबियांना सांगण्यात आले. मात्र, तिच्या शरीरावर असंख्य वळ आणि जखमा मारहाणीच्या दिसून आल्या. वैष्णवीचा प्रेमविवाह होता आणि तब्बल ५१ तोळे सोने तिला देण्यात आले. हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हिने देखील सांगितले की, वैष्णवीला कशाप्रकारे त्रास दिला जात होता.
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर मयुरी जगताप ही कॅमेऱ्यासमोर आली आणि तिने आपल्याला देखील कशाप्रकारे मारहाण केली जात होती हे सांगितले. तिने काही व्हिडीओ आणि फोटोही दाखवली. मयुरीने पोलिसात अगोदरच तक्रार दिली होती आणि तिची केस सुरू आहे. वैष्णवी आणि शंशाक यांच्या लग्नाला अजित पवार देखील उपस्थित होते. अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांसोबत कालच फोनवरून संवाद देखील साधला. काल कसपटे कुटुंबियांच्या भेटीला स्वत: आदिती तटकरे पोहोचल्या होत्या.वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मराठा समाजाचे धनंजय जाधव, अश्विनी खाडे व इतरांनी जाब विचारला, महिला आयोगाने काय कारवाई केली, मीडियासमोर बोला असे म्हटले.









