देशात पुन्हा करोनाची दहशत, दोघांचा मृत्यू, रुग्णांची संख्याही वाढती; महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडूने टेन्शन वाढवलं.

भारतात जी काही प्रकरणं समोर आली आहेत ती सध्या खूपच सौम्य आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभाग कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असं आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.करोनाने पुन्हा एकदा जगात दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता भारताचंही टेन्शन वाढलं आहे. तर, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भारतातही काही रुग्ण समोर आले आहेत. केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सध्या देशातील सर्वाधिक करोना रुग्ण आढळले आहेत, ज्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडूमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. केरळमध्ये आतापर्यंत ६९ सक्रिय करोना रुग्ण सापडली आहेत. तर, तामिळनाडूमध्ये ३४ सक्रिय रुग्ण आहेत. तर, महाराष्ट्रातही करोनाची ४४ सक्रिय प्रकरणं आहेत. महाराष्ट्रातही आरोग्य विभाग करोनाच्या वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. याशिवाय कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीमध्येही करोनाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे.सध्या दिल्लीत करोनाचे तीन सक्रिय रुग्ण आढळले आहेत. तर कर्नाटक आणि गुजरातमध्ये अनुक्रमे 8 आणि 6 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त, हरियाणा, राजस्थान आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आढळला आहे.

मुंबईतही करोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आशियाई देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रसार झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा करोनाबाबत चिंता वाढली आहे.हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये करोनाचे वाढते रुग्ण सातत्याने नोंदवले जात आहेत. सिंगापूरमध्ये मे महिन्यातच करोनाचे 14000 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. सध्या भारतात ही संख्या फक्त 257 सक्रिय प्रकरणांपुरती मर्यादित आहे. जे लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. आरोग्य मंत्रालयाने अनेक आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. बैठकीनंतर असे सांगण्यात आले की सध्या भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.