बीड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणाला काही लोकांनी बेदम मारहाण केली. शिवराज दिवटे नावाच्या तरुणाचे अपहरण करून त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेण्यात आले. तिथे त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे ‘संतोष देशमुख पार्ट टू’ करण्याची धमकी देत होते, असे दिवटेने सांगितले.केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये.
या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही तरूणांनी मिळून ही मारहाण केली. शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव आहे. एका टोळक्याने त्याचे अगोदर अपहरण केले आणि त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेऊन बांबू आणि लाकडाने मारहाण केली.
सध्या शिवराज दिवटे याच्यावर उपचार सुरू असून त्याची तब्येत स्थिर आहे. या बेदम मारहाणीबद्दल बोलताना शिवराज दिवटे हा म्हणाला की, काही लोक मदतीला धावून आल्यानेच मी जिवंत राहू शकलो, अन्यथा त्यांनी मला जिवंत सोडले नसते. यासोबतच शिवराज दिवटे याने धक्कादायक खुलासा देखील केलाय. मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असे म्हणत होते, असेही शिवराज दिवटेने म्हटले.









