‘शरद पवारांच्या ‘त्या’ एका मुद्द्यावर नरेंद्र मोदींची अटक टळली’, संजय राऊतांनी पुस्तकामध्ये सर्व काही सांगितलं.

 संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. शरद पवार यांनी यूपीए सरकारमध्ये असताना नरेंद्र मोदींना अटक होण्यापासून वाचवले होते, कारण लोकशाही मार्गाने निवडलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे योग्य नाही, असे पवारांचे मत होते. तसेच अमित शहा खून प्रकरणात आरोपी असताना बाळासाहेब ठाकरेंनी कशी मदत केली होती. याबद्दलह पुस्तकामध्ये सांगितलं गेलं आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामध्ये अनेक खळबळ जनक दावे केले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन उद्या म्हणजे शनिवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र त्याआधीच या पुस्तकाची चर्चा माध्यमांवर होताना दिसत आहे. याचं कारण म्हणजे यामध्ये संजय राऊत यांनी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि शाहांना त्यावेळी केलेल्या मदतीबद्दलचा खुलासा त्यामध्ये केला आहे. शरद पवार हे यूपीए सरकार मध्ये असताना त्यांनी नरेंद्र मोदींची अटक कशी टाळली होती याबद्दलचा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्य संघर्ष सुरू होता. याचदरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री अमित शाहांना तुरूंगात टाकलं होतं. कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींकडे होता. मात्र लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं. पवारांनी त्यामुळे मोदींची अटक टळली, मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवले? असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.अमित शहा खून प्रकरणात आरोपी होते आणि त्यांना तडीपारही केलं गेलं होतं. अमित शाह यांना जामीन देण्यास सीबीआयच्या पथकाचाही कडाडून विरोध होता. पथकात महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते.

त्यावेळी मोदींनी पवारांना फोन केला आणि त्यांनीही स्वभावानुसार मदत केली. शाहांना एका जामीन प्रकरणात मिळाला, हेच अमित शाह महाराष्ट्राशी कसे वागले, असा सवालही राऊतांनी केला आहे.आज गोदीमीडिया झालेला प्रत्येकजण मोदीविरोधी होता. पण त्यावेळी ठाकरे, शिवसना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा राहिला. त्याच मोदींनी असुरी पद्धतीने फोडली. पवार मोदींना भेटले तेव्हा माझ्यावरील कारवाई टाळली जाईल या भाकडकथांवर माझा विश्वास नव्हता. त्यांनी मला अटक केल्याचं संजय राऊतांनी पुस्तकात म्हटलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.