गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलाने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता.गडचिरोली: देशात एकीकडे सीमारेषेवर तणाव असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवरुन लष्कर अलर्ट मोडवर आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पहलगाम हल्ल्याचा बदला घेत दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. भारतीय वायुसेनेच्या या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे. एकीकडे भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांच्या तळांना समूळ नष्ट करण्यात येत असताना दुसरीकडे गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील नक्षलवादी (Naxalite) कारवायांवरही सुरक्षा दलाकडून मोहिम राबवली जात आहे. भामराकडजवळ नक्षलवादी कारवायांसाठी उभारण्यात आलेला तळ गडचिरोली पोलिसांनी (Police) उध्वस्त केला आहे.










